जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह गारपिटमुळे पिकांचे मोठे नुकसान ; पालकमंत्र्यांनी दिले पंचनाम्याचे निर्देश
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : रावेर तालुक्यात व १३ एप्रिल रोजी जळगाव तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यांसह पावसामुळे व गारपिटीनंतर शेतपिकांचे नुकसान झाले आहे. विशेषतः रावेर शहरासह भोकर, भादली खुर्द परिसरामध्ये तसेच जिल्ह्यात इतर ठिकाणीही केळी व मका या नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. अचानक आलेल्या या हवामान बदलामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले…
