SANDIP RANDHE

पिंप्राळा नगरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मनात शिकण्याची जिद्द असून सुद्धा आर्थिक परिस्थिती बिकट असल्याकारणाने समाजातील अनेक विद्यार्थी शैक्षणिक साहित्य अभावी शिक्षणापासून वंचित राहू शकतात हे बाब डोळ्यासमोर ठेवून जळगाव शहरात गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या वर्षा प्रदिप पाटील यांच्या वतीने विद्यार्थी विकास केंद्रातील गुणवंत होतकरू विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले….

Read More

पाळधीत संचारबंदी लागू ; रस्त्यावर दिसल्यास कारवाई, जनतेने शांतता ठेवावी अफवांना बळी पडू नये : पोलिस प्रशासन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मंगळवार दि.३१ डिसेंबर रोजी रात्री दोन गटात संघर्ष होऊन काही दुकानांची तसेच वाहनांची जाळपोळ करण्यात आली. पोलिसांनी गावातील परिस्थिती नियंत्रणात आणली असून तणावपूर्ण शांतता असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार गावातून काही वाहने जात असतांना, त्यातील एका वाहनाचा कट लागल्याने, या वाहनांच्या दिशेने बघून काही तरुणांनी शिवीगाळ…

Read More

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.०’ योजनेसंदर्भात आढावा बैठक संपन्न

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवार दि.३१ रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.०’ योजनेसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, अप्पर मुख्य सचिव, सचिव, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या महाराष्ट्र शासनाच्या फ्लॅगशीप उपक्रमाकरिता प्रकल्प विकासकांना येणाऱ्या…

Read More

नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या नागरिकांना शुभेच्छा

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : नववर्षाच्या पूर्वसंधेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवा महाराष्ट्र घडवायचा आहे, प्रगतीशील महाराष्ट्राला आणखी गतीशील बनवायचे आहे. त्यासाठी आपण सर्वांनी महाराष्ट्र आता थांबणार नाही…अशी प्रतिज्ञा करूया, एकजूट करुया असा निर्धार व्यक्त केला. हा निर्धार पूर्ण करण्यासाठी राज्यातील कष्टकरी, शेतकरी, कामगारासह सर्वांचीच साथ लाभेल,…

Read More

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी छत्रपती शाहू वैद्यकीयनगरी तयार : मंत्री हसन मुश्रीफ

लवकरच परिसरात भव्य असा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळाही उभारणार कोल्हापूर ( वास्तव पोस्ट ) : शेंडा पार्क येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २९ एकरात राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय नगरी उभारण्याचे काम सुरू आहे. यातील पुर्ण झालेल्या इमारती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत कार्यान्वित झाल्या. यामध्ये मुलींचे वसतीगृह, शवविच्छेदन गृह इमारत, व्याख्यान कक्ष व…

Read More

इस्रोच्या ‘स्पॅडेक्स PSLV-C60’ यशस्वी मोहिमेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक

नवीन वर्षाच्या पूर्वसंधेला भारतीयांना अप्रतिम वैज्ञानिक भेट मुंबई ( वास्तव पोस्ट ) : नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) भारतीयांना अप्रतिम वैज्ञानिक भेट दिली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताच्या ‘स्पॅडेक्स PSLV-C60’ या महत्वाकांक्षी मोहिमेच्या यशाचे कौतुक करत या संशोधन प्रकल्पात सहभागी इस्रोच्या वैज्ञानिक, अभियंते यांचे अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण : अखेर वाल्मीक कराड पुणे सीआइडी ला शरण !

पुणे ( वास्तव पोस्ट ) : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारण्यांकडे जनतेचे लक्ष लागून होते. कारण या हत्याकांडातील संशयित मास्टरमाईंड वाल्मिक कराड याचे जवळपास सर्वच प्रमुख राजकीय नेत्यांसोबत उठबस असल्याचे फ़ोटो आणि विडिओ प्रसार माध्यमात व्हायरल झाले होते. अखेर आज मंगळवार दि.३१ रोजी पुणे सीआयडी अधिकाऱ्यांसमोर शरणागती पत्करली. दरम्यान वाल्मिक कराड शरण…

Read More

मणियार विधी महाविद्यालयात रक्तदान शिबिर यशस्वी

जळगाव ( जळगाव ) : एस.एस. मणियार विधी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि रेडक्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवार दि.३० रोजी रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडले. शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी. युवकुमार रेड्डी आणि रेडिक्रोस सोसायटीचे डॉ. तासखेडकर यांनी केले. यावेळी मंचावर रासेयो समन्वयक प्रा. गणपत धुमाळे, डॉ.डी.आर. क्षीरसागर, डॉ.रेखा पहुजा हे होते. कार्यक्रमास…

Read More

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार : ॲड. माणिकराव कोकाटे यांचे प्रतिपादन

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : कृषी विभागातील केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. राज्याचे कृषिमंत्री म्हणून पदभार घेताना मंत्रालय येथे ते बोलत होते. कृषी विभागात आवश्यक तिथे सुधारणा करून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल. केंद्र व राज्य शासनाच्या योजना राज्यात…

Read More

भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षपदी नव्यांना संधी मिळणार का ?

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांची महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात निवड झाल्यानंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षपदी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. पुढच्या वर्षी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे भाजप मुंबई अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आशिष शेलार यांची…

Read More

संतोष देशमुख हत्या प्रकरणी फरार वाल्मीक कराडसह चार जणांची बँक खाती सील !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर सीआयडी ताबडतोब कामाला लागले असून सरपंच हत्या प्रकरणात फरार आरोपींची बँक खाते सील करण्यात आली आहेत. बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीच्या जवळपास नऊ टीम कार्यरत आहेत. या सर्व टीममध्ये सुमारे दीडशेहून अधिक सीआयडी अधिकारी तसेच कर्मचारी कार्यरत आहेत….

Read More

जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावण्याचे आवाहन ; ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संकेतस्थळ उपलब्ध

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : सर्वोच्च न्यायालयाने सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी अर्थात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादीत केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. अशा वाहनांना ही नोंदणी क्रमांकाची पाटी असणे बंधनकारक असणार आहे. मात्र…

Read More

चिमुकल्या बहिणींवर अत्याचार करून हत्या ; विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे राजगुरूनगरमध्ये

पुणे ( वास्तव पोस्ट ) : राजगुरुनगरमध्ये शेजारीच वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतीय ५४ वर्षीय नराधमाने २ चिमुकल्या मुलींवर अत्याचार करुन खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा सर्वत्र निषेध नोंदवण्यात येत आहे. दरम्यान, आज शुक्रवार दि.२७ रोजी शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या राजगुरूनगरमध्ये पोहचल्या असून त्यांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राजगुरूनगरमध्ये…

Read More

नोकरीसाठी केलेल्या अर्जावर १८% जीएसटी लागणार ! सरकार तरुणांच्या जखमेवर मीठ चोळतेय : खा. प्रियंका गांधी वाड्रा

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : देशात बेरोजगारांची संख्या वाढतच चालली असून बेरोजगार जास्त आहे आणि त्यामानाने नोकऱ्या कमी आहेत. यामुळे तरुणांना आपल्या प्रतिभा किंवा कौशल्य दाखवण्याची संधी मिळत नाही. एका पदासाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली तरी हजारो अर्ज येतात. या स्पर्धात्मक युगात सरकारी नोकरी ही तरुणांची पहिली पसंती आहे. दरम्यान बेरोजगारांना नोकऱ्या देण्यासाठी…

Read More

देशाने प्रशासक, अर्थतज्ञ गमावला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई (वास्तव पोस्ट ) : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाने देशाने एक उमदा प्रशासक, अर्थतज्ञ गमावला आहे, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, पंतप्रधान अशा विविध भूमिकांमधून त्यांनी काम केले आणि देशवासियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. भारताच्या राजकारणात…

Read More
error: Content is protected !!