Home » महाराष्ट्र » परभणी हिंसा प्रकरण : मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा फेटाळला !

परभणी हिंसा प्रकरण : मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा फेटाळला !

PARBHANI VIOLENCE : आम्हाला १० लाख नकोत, माझ्या मुलाला काहीही आजार नव्हता अशा शब्दात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सूर्यवंशी यास श्वसनाचा दुर्धर आजार असल्याचा दावा फेटाळून लावला आहे.

नागपुर ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीतील संविधानाच्या शिल्पाची विटंबना, त्यानंतर उफळलेला हिंसाचार आणि झालेल्या तोडफोडीबाबत विधिमंडळात सविस्तर माहिती दिली. तसेच पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाला अगोदरच आजार होता, अससेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले. मात्र यानंतर अवघ्या दहाच मिनिटांतच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईन फडणवीसांचा हा दावा खोडून काढला आहे. माझा मुलगा आजारी नव्हता. मला तुमचे दहा लाख रुपये नकोत, अशी स्पष्ट भूमिका सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने घेतली आहे.

दरम्यान त्या पुढे म्हणाल्या की, माझा मुलगा चार दिवस पोलिसांच्या ताब्यात होता. तेव्हा मला का बोलवले नाही. माझा मुलगा आजारी होता, तर त्यांनी आम्हाला का बोलावले नाही. मृत्यू होईपर्यंत मला का बोलावले नाही ? माझ्या मुलाला आजार नव्हता. त्याला साधे तंबाखू, सुपारीचे व्यसन देखील नव्हते. माझा मुलगा खूप व्यवस्थित होता. माझ्या मुलाच्या अंगावर जखमा होत्या, असं रिपोर्टमध्ये का आले ? असे सोमनाथ प्रश्नही सूर्यवंशी यांच्या आईने उपस्थित केले आहे.

सोमनाथ सूर्यवंशीला श्वसनाचा दुर्धर आजार होता : मुख्यमंत्री फडणवीस

परभणीत जी जाळपोळ सुरु होती, त्या व्हिडीओत सूर्यवंशी दिसत असल्याने त्यांना अटक करण्यात आली. सूर्यवंशी यांना दोनवेळा मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आले. त्यांच्या ऑर्डरची कॉपी माझ्याकडे आहे. दोन्ही वेळा मॅजिस्ट्रेटने त्यांना विचारले की, पोलिसांनी तुम्हाला थर्ड डिगरी मारहाण केली का, तुम्हाला मारहाण झाली का? सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कोठडीत असतानाचे फुटेजही उपलब्ध आहे. त्यांना कुठेही मारहाण झाल्याचे दिसत नाही. पोस्टमार्टेम अहवालाचे पहिले पान सगळ्यांनी वाचले असेल. पण सूर्यवंशीच्या वैद्यकीय तपासणीत लिहले आहे की, त्यांना श्वसनाचा दुर्धर आजार होता. वैद्यकीय अहवालात त्यांच्या जुन्या जखमांचाही उल्लेख आहे. त्यांच्या एका खांद्याजवळचे हाडही तुटले आहे. त्यांना न्यायालयीन कोठडी असताना सकाळी छातीत जळजळ सुरु झाली. त्यावेळी पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले, त्यांना तिकडे मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!