Headlines

‘रेमल चक्रीवादळ’ पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकले ; पर्यटकांना बाहेर न पडण्याचा इशारा

कोलकता ( वास्तव पोस्ट न्यूज ) : बांगलादेशाच्या सिमेहुन निघालेले ‘रेमल चक्रीवादळ’ पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकल्यामुळे किनारपट्टी भागात प्रचंड नुकसान झाले आहे.यामध्ये कोलकाता येथील एकाचा मृत्यू झाला. चक्रीवादळासोबत आलेल्या मुसळधार पावसामुळे त्या परिसरातील घरे, शेत पाण्याखाली गेली आहेत. ताशी १३५ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या या वाऱ्यांमुळे किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तीनही किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा…

Read More

टीआरपी गेम झोनमध्ये लागलेल्या आगीत २७ जणांचा होरपळून मृत्यू ; १२ मुलांचा समावेश !

राजकोट ( वास्तव पोस्ट न्यूज ) : गुजरातच्या राजकोटमधील टीआरपी गेम झोनमध्ये शनिवारी संध्याकाळी लागलेल्या भीषण आगीत २७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये १२ लहान मुलांचाही समावेश असुन अनेकजण अद्याप बेपत्ता असल्याचेही सांगितले जात आहे. आग लागण्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नसुन आगीची दुर्घटना ही शॉर्ट सर्किटमुळे घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान “टीआरपी…

Read More

बुट व्यापाऱ्यांवर आयटी विभागाच्या धाडी; ६०कोटी रोकड व दागिने जप्त

आग्रा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : आयकर विभागाने आग्रा येथे तीन बूटांच्या व्यापाऱ्यांवर छापे टाकले. गेल्या काही दिवसांत १०० पेक्षा अधिक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. या धाडीत पाच-पाचशेंच्या नोटांचे बंडल मोजण्यासाठी आयकर विभागाचे ३० पेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले आहेत. दरम्यान आग्रा येथील छापेमारीत बूट व्यावसायिकाच्या घरातून मोठी रोकड जप्त करण्यात…

Read More

दिल्लीत आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग ; अग्नीशमन दलाचे २१ वाहने तैनात

दिल्ली | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राष्ट्रीय राजधानीच्या आयटीओ परिसरात असलेल्या सीआर बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावर आयकर कार्यालयास आग लागल्याची घटना घडली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या एकूण २१ गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. २०२४ लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचे वारे घमासान वाहत असताना व दुसरीकडे भाजप सरकारच्या आयटी, ईडी, सीबीआय़वर देशभऱातील विरोधक आरोप…

Read More

EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाखल ; आता लक्ष निर्णयाकडे !

नवी दिल्ली | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – EVM-VVPAT प्रकरणाच्या २६ एप्रिलच्या निकालाला आव्हान देणारी पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. फेटाळण्यात आलेल्या याचिकांमध्ये व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) रेकॉर्डसह इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) डेटाच्या १०० टक्के क्रॉस-व्हेरिफिकेशनची मागणी करण्यात आली होती. अरुण कुमार अग्रवाल यांनी ही याचिका दाखल केली…

Read More

अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर ;भाजप व मित्र पक्षांचा पराभव अटळ : डॉ. डी.एल. कराड

जळगाव | दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज )– आम आदमी पार्टीचे प्रमुख तथा इंडिया आघाडीचे नेते अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्याच्या निर्णयाचे स्वागत माकपा नेते डॉ. डी एल कराड यांनी केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मोदी सरकारने अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरू असताना कट करुन अटक केली व तुरुंगात…

Read More

अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामिन मंजूर ; प्रचारासाठी लवकरच मैदानात

नवी दिल्ली | दि१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. आज संध्याकाळपर्यंत केजरीवाल बाहेर येण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनमुळे आम आदमी पक्ष तसेच इंडिया आघाडीला मोठा फायदा होणार आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान आपल्याला प्रचार करण्याची…

Read More

केजरीवाल यांच्या अंतरीम जामिनावर आजही निर्णय नाही; पुढील सुनावणी ९ मे रोजी

नवी दिल्ली | दि. ७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या अंतरीम जामीनावर सर्वोच्च न्यायालयाने आज झालेल्या दीर्घ सुनावणीनंतरही कोणताही निर्णय घेतलेला नाही, या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ मे रोजी होणार आहे. सध्या लोकसभा २०२४ सार्वत्रिक निवडणूका असल्याने त्यांना अंतरीम जामीन देण्याचा निर्णय होऊ शकतो असे संकेतही कोर्टाने…

Read More

अहमदाबादमधील ३ शाळांना बॉम्बने उडवून देण्याची इमेलद्वारे धमकी; पोलिस यंत्रणा सतर्क

अहमदाबाद | दि.६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – दिल्लीनंतर आता अहमदाबादच्या तीन शाळांना ईमेलद्वारे बॉम्ब ब्लास्टची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील काही शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर ईमेलद्वारे मिळणाऱ्या या धमकींमुळे पोलिस यंत्रणा मात्र अलर्ट मोड आहे. अहमदाबाद पोलीस या प्रकरणाचा तपास…

Read More

मंत्र्याच्या स्वीय सचिवाच्या घरी ईडीची छापेमारी ;३० कोटीचे घबाड जप्त !

रांची | दि.६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या उद्या होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या आधीच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) झारखंडची राजधानी रांचीमध्ये अनके ठिकाणी छापेमारी केली आहे. या छापेमारीत मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरातून ईडीने मोठी रोकड जप्त…

Read More

दिल्ली आणि नोएडातील ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; ईमेलमुळे उडाली खळबळ

दिल्ली | दि.१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राजधानी दिल्ली आणि नोएडा येथील ८० हून अधिक शाळांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा ई-मेल प्राप्त झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. दिल्लीतील द्वारका येथील DPS तसेच मयूर विहारच्या मदर मेरी आणि नवी दिल्लीतील संस्कृति स्कूल व्यतिरिक्त नोएडा येथील DPS स्कूल यांसारख्या हायप्रोफाईल शाळांचा यामध्ये समावेश आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास…

Read More

दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांना पुन्हा फटकारले

नवी दिल्ली | दि१० ( वास्तव पोस्ट न्यूज )– नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या पतंजलीच्या जाहिराती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि सरकारला फटकारले आहे. बाबा रामदेव यांचा माफीनामा देखील स्वीकारण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच सरकारच्या उत्तरावर न्यायालयही समाधानी नसल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाशी सबंधित असलेल्या अधिकाऱ्यांनाही न्यायालयाने फटकारले असुन पुढील कारवाईसाठी तुम्ही तयार राहा,…

Read More

काँग्रेसच्या सहा आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश; काँग्रेसच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली | दि.२४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या ६ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे. हिमाचल प्रदेश राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्यामुळे अपात्र केलेल्या काँग्रेसच्या सहा आमदारांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या आमदारांमध्ये काँग्रेसचे सुधीर शर्मा, रवी ठाकूर, राजेंद्र सिंह राणा, चैतन्य शर्मा, देवेंद्र भुट्टो,…

Read More

मोठी बातमी : अखेर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक

दिल्ली | दि.२१ ( वास्तव पोस्ट न्यूज )– दिल्लीचे मुख्यमंत्री आप पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना शंभर कोटीं रुपयांच्या दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात ईडीने अटक केली आहे. ईडीचे अधिकारी दोन तास केजरीवाल यांच्या घरी ठाण मांडून होते. दिल्ली विधानसभा अध्यक्ष रामनिवास गोयल यांनी सांगितले की अटक जरी झाली असली तरी देखील केजरीवाल आपल्या मुख्यमंत्री पदाचा…

Read More

भारतीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रासह ६ राज्यातील गृहसचिवांची बदली; BMC आयुक्त चहल यांचाही समावेश

नवी दिल्ली | दि.१८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -भारतीय निवडणूक आयोगाने आज गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांच्या गृहसचिवांची बदली केली. निवडणूक नियामक मंडळाने पश्चिम बंगालचे महासंचालक राजीव कुमार यांनाही हटवले आहे. लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर काही तासात सीईसी राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील मतदान समितीने मिझोराम आणि…

Read More
error: Content is protected !!