Headlines

दिपक जाधव

राजकोट कसोटीत दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालचे तडाखेबंद द्विशतक ; टीम इंडिया मजबूत स्थितीत

राजकोट, दि.१८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– राजकोट येथे खेळल्या जात असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामनातील दुसऱ्या डावात भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने द्वीशतक झळकावले. यशस्वी जैस्वालने २३२ चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले. त्याने इंग्लंडविरुद्ध एका मालिकेत दुसऱ्यांदा द्विशतक झळकावून इतिहास रचला आहे. त्याचबरोबर अनेक दिग्गजांचे विक्रम देखील आपल्या…

Read More

धरणगावनजीक पुलाखाली कापूस व्यापाऱ्यास लुटले ;दीड कोटी घेऊन पोबारा

धरणगाव, दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – धरणगाव येथील दुर्गेश इम्पेक्स जिनिंगचे जवळजवळ दीड कोटी रुपयांचे पेमेंट जळगावहून कारने नेले जात होते. व्यापाऱ्याची कार अडवून तब्बल दीड कोटी रुपयांची रक्कम तीन चोरट्यांनी लुटून नेली. ही घटना आज दुपारी पावणेदोन वाजता धरणगाव नजीक मुसळी फाट्याजवळ घडली. धरणगाव रोडवर उड्डाण पुलाखाली पैसे असलेली कार आली असता…

Read More

राजकोट कसोटीत भारताची आघाडी ; यशस्वी जैस्वालचे नाबाद शतक

राजकोट, दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज )- राजकोटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. आज तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात सलामीवीर यशस्वी जैस्वालने १२२ चेंडूचा सामना करत ९ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने शतक झळकावले. मात्र पाठीच्या दुखण्याच्या त्रास सुरु झाल्याने त्याला रिटायर्ट हर्ट व्हावे लागले. तत्पूर्वी त्याने शुबमन…

Read More

‘यूपीए’ सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली – पंतप्रधान मोदी ;

नवी दिल्ली,दि.१७( वास्तव पोस्ट न्यूज )– पंजाब-हरियाणाच्या शंभू सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असताना, हरियाणामधील रेवाडी येथील जाहीर कार्यक्रमात, काँग्रेसप्रणित ‘यूपीए’ सरकारवर शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप मोदींनी केला. ‘केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी योजना राबवत आहे’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंजाब व हरियाणातील शेतकरी किमान आधारभूत किमती संदर्भात कायदा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी आंदोलन करत असून त्यासंदर्भात मोदींनी…

Read More

अन्यथा मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही ; उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज )– आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही ज्या उमेदवाराला उभा करू त्याला तुम्ही खासदार केलं पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे. तुम्ही लोकसभेला आमच्या उमेदवाराला निवडून दिलं तरच मी विधानसभा निवडणुकीला उभा राहीन, अन्यथा मी निवडणूक लढवणार नाही, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. अजित पवार बारामतीकरांना म्हणाले, तुम्ही साथ…

Read More

‘कोल्हापुर प्रेस क्लब’च्या वतीने उत्कृष्ट पत्रकारीतेबद्दल पत्रकारांचा सन्मान

कोल्हापुर, दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज )– ‘कोल्हापूर प्रेस क्लब’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकार बांधवांना सन्मानित केले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, प्रेस…

Read More

बकासुराचा वाडा- एक प्राचीन गूढ !!

बकासुर हा एक कोकणी होता नव्हे तर तो वैभववाडीकर होता बकासुर हा एक कोकणी होता नव्हे तर तो वैभववाडीकर होता असं तुम्हाला सांगितले तर खर वाटेल काय?बकासुर आणि भीमाच्या युद्धाची कथा आपण महाभारतात ऐकली आहे. हा कथेतला बकासुर खरंच होता का? त्याचे खरोखरच भीमाशी युद्ध झाले होते का? तसे झाले असेल तर ते ठिकाण कोणते?…

Read More

स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार अशोक जैन यांना जाहिर

जळगाव दि. १६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – सातारा जिल्ह्यातील उंडाळे ता. कराड येथे स्वातंत्र्य सैनिक दादा उंडाळकर यांच्या ५० व्या स्मृतीदिनानिमित्त ४१ वे स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळाव्याचे रविवारी ता.१८ ला आयोजन करण्यात आले आहे. अधिवेशनात यंदाचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार जळगावच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन…

Read More

हनुमान गढी ते राम मंदिर दरम्यान सुग्रीव पथ बांधणार ; भाविकांना राम मंदिर पर्यंत जाणे होणार सुलभ

अयोद्धया, दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज )– अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर शहरातील लोकांची ये-जा वाढली आहे. मंदिरात प्रभू रामाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत असून ही बाब लक्षात घेऊन उत्तर प्रदेश सरकारने सुग्रीव पथ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सविस्तर वृत्त असे की उत्तर प्रदेश सरकारने सुग्रीव पथ नावाचा नवीन रस्ता तयार करण्याची घोषणा…

Read More

मॅच फिक्सिंगमुळे रिझवानची कारकीर्द संपुष्टात ;ICC ने घातली १७ वर्षांची बंदी

नवी दिल्ली, दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा भ्रष्टाचार आणि मॅच फिक्सिंगचा प्रकार समोर आला आहे. अबू धाबी T10 लीगमधून ही बाब समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मॅच फिक्सिंगचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली इंग्लंडच्या क्लबचा खेळाडू रिझवान जावेद क्रिकेटपटूवर कठोर कारवाई केली. आयसीसीने रिझवानवर १७ वर्षांची बंदी घातली आहे. ही…

Read More

अवैध बनावट मद्य कारखान्या विरोधात धडक कारवाई; ४६ लाखांपेक्षा अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त

जळगाव ,दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज )- भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथे बनावट देशी दारू बनविणाऱ्या कारखान्यावर छापा टाकुन बनावट देशी मद्याची निर्मिती करतांना ०१ आरोपीला अटक करुन महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आली आहे. त्याच बरोबर ४६ लाख ३७ हजार पाचशे एवढ्या किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अशी माहिती जळगाव जिल्हाधिकारी…

Read More

गोळीबार प्रकरण : महेश गायकवाड यांना आज डिस्चार्ज मिळणार नाही !! पोलीस मात्र अलर्ट मोडवर

कल्याण, दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज )– शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर २ फेब्रुवारीला कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता. सत्ताधारी गटाच्या आमदाराने पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याच्या या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं होतं. या घटनेत महेश गायकवाड गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान महेश गायकवाड…

Read More

मराठा समाजाचे मागासलेपण सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द

मुंबई, दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज )- मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपुर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. ‘वर्षा’ निवासस्थानी आज सकाळी हा अहवाल सुपुर्द करतेवेळी आयोगाचे सदस्य देखील उपस्थित होते. यावेळी आयोगासह संपूर्ण प्रशासकीय…

Read More

जळगावकरांना अनुभवता येणार ‘जाणता राजा’ महानाट्य ; ३५० व्या शिवराज्यभिषेक वर्षानिमित्त आयोजन

जळगाव, दि.१६ ( वास्तव पोस्ट जळगाव )– छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारीत ‘जाणता राजा’ या महानाट्याचे आयोजन १८,१९ व २० फेब्रुवारी या सलग तीन दिवसात पोलीस कवायत मैदानात होणार आहे. दर दिवशी आठ ते दहा हजार प्रेक्षक बसु शकतील अशी आसन व्यवस्था…

Read More

‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ ; मंत्री गिरीश महाजन यांना ‘पॉवर पॉलिटिक्स’ म्हणून विशेष पुरस्कार

मुंबई, दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज )– मुंबईतील ऐतिहासिक ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’चा दिमाखदार सोहळा संपन्न झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गेल्या वर्षभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये…

Read More
error: Content is protected !!