SANDIP RANDHE

निवडणूक आयोगाने आपल्या वेबसाईटवर अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा ७६३ पानांचा डेटा !

नवी दिल्ली | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या इलेक्टोरल बॉन्ड्स बाबतची माहीती निवडूक आयोगाने मुदातीच्या आतच आपल्या वेबसाइट वर प्रसिद्ध केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला १५ मार्च २०२४ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत डेटा वेबसाइटवर अपलोड करण्यासाठी मुदत दिली होती. न्यायालयाच्या निर्देशानंतर, स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) १२ मार्च…

Read More

जिल्ह्यातील बँकांनी कृषी व कृषीपूरक व्यवसायाला अर्थसहाय्य करुन रोजगार निर्मितीस चालना द्यावी :जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जिल्ह्यात कृषी व पूरक व्यवसायाकडे जिल्ह्याच्या आर्थिक परिवर्तनाची ताकत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील बँकांनी याकडे लक्ष देण्याची गरज असून त्यातून रोजगार आणि जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. पशुपालन, मत्स्य व्यवसायाच्या प्रक्रिया उद्योगात खुप मोठी संधी आहे. त्या दृष्टीने सर्व बँकांनी काम करावे अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद…

Read More

भारतात १०ॲप्स,५७ सोशल मिडीया हॅंडल, ओटीटी प्लॅटफॉर्म, आणि काही वेबसाईट्सवर बंदी

नवी दिल्ली | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अभद्र, आणि काही प्रकरणांमध्ये अश्लील सामग्री प्रस्तुत करणाऱ्या १८ ओटीटी प्लॅटफॉर्मवर, सोशल मीडिया अकाउंट आणि अनेक वेबसाइटवर पूर्णपणे बंदी घातली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की, देशभरात १८ ओटीटी प्लॅटफॉर्मला प्रसारण मंत्रालयाकडून अनेकवेळा ताकीद देण्यात आली होती….

Read More

देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचा दबदबा कायम; विदर्भाला नमवत ४२व्यांदा जिंकली रणजी ट्रॉफी

मुंबई | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात मुंबई क्रिकेट टीमने ४२ व्यांदा रणजी ट्रॉफी जिंकुन इतिहास घडवला आहे. मुंबईने अंतिम सामन्यात विदर्भावर १६९ धावांनी विजय मिळवला. मुंबईने विदर्भासमोर विजयासाठी ५३८ धावांचं आव्हान ठेवलं होतं. विदर्भानेही जोरदार खेळ करत चौथा दिवस खेळून काढला. पाचव्या दिवशीही जोरदार खेळ सुरु केला. जिंकण्याच्या उद्देशाने…

Read More

अनिल परब यांचे दापोली येथील रिसॉर्ट पाडण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश

रत्नागिरी | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज )– अनिल परब यांचे दापोलीमधील साई रिसॉर्ट पडणार हे आता निश्चित झाले आहे. साई रिसॉर्ट अनधिकृत असल्याचे हायकोर्टामधील सुनावणीदरम्यान स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनिल परब आणि सदानंद कदम यांना चार आठवड्यात हा रिसॉर्ट पाडा असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०२० मध्ये या…

Read More

रेडक्रॉस जळगाव शाखेला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ठ रेडक्रॉस शाखा पुरस्कार प्रदान

जळगाव | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – रेडक्रॉस राज्य शाखा मुंबईच्या वतीने रेडक्रॉस जळगाव शाखेला सन २०२१-२२ च्या कार्यकाळात वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध सेवाभावी उपक्रमांसाठी देण्यात येणारा राजा महाराजा सिंह सर्वोत्कृष्ठ रेडक्रॉस शाखा पुरस्कार तसेच सन २०२२-२३ च्या कार्यकाळात रेडक्रॉसच्या सेवाकार्यात सर्वात जास्त नवीन सभासदांना सहभागी करण्यासाठीचा रेडक्रॉस राज्य शाखेचा मेरिट पुरस्कार देऊन…

Read More

भाजपकडून लोकसभेची दूसरी यादी जाहीर; जळगाव मतदारसंघातुन स्मिता वाघ, तर रावेर मधून रक्षा खडसे यांना उमेदवारी

नवी दिल्ली | १३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – भाजपकडून २०२४ लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. यात महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यादीत बहुचर्चित भाजप नेत्या पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, रक्षा खडसे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती. पण पक्षाने त्यांना…

Read More

मुंबईतील ८ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यास मंत्रिमंडळाकडून आजच्या बैठकीत ग्रीन सिग्नल

मुंबई | दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईतील ८ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रिटिश कालीन नावं असलेल्या या रेल्वे स्थानकांचे आता नामकरण केले जाणार आहे. मुंबईतील ज्या ८ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यास मान्यता मिळाली आहे त्यात, करी रोड रेल्वे स्थानकाचे नाव लालबाग असं केले जाणार…

Read More

अहमदनगर शहराचे नामांतर; आता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या नावाने ओळखलं जाणार ‘नगर’

मुंबई | दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत अहमदनगर शहराच्या नामांतराबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. अहमदनगर शहराला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी विविध पक्षाच्या नेत्यांकडून तसेच कार्यकर्त्यांकडून केली जात होती. अखेर सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अहमदनगर शहराचं नामांतर…

Read More

काँग्रेसची दुसरी यादी: मध्य प्रदेश-राजस्थानसह सहा राज्यांतील ४३ उमेदवारांची यादी जाहीर

नवी दिल्ली | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आज दुसरी यादी जाहीर केली. काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत ६ राज्यांमधून ४३ नावे जाहीर केले आहेत. यामध्ये आसाममधून १२, राजस्थानमधून १०, मध्य प्रदेशातून १०, गुजरातमधून ७, उत्तराखंडमधून ३ आणि दमण बेटातून १ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत ४३ उमेदवारांची…

Read More

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, भारतीय निवडणूक आयोगाला इलेक्टोरल बॉन्ड्स संदर्भातला डेटा सुपूर्द

नवी दिल्ली | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – इलेक्टोरल बाँड बाबत दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर बार असोसिएशनने मोठं पाऊल उचललं आहे. संघटनेच्या वतीनं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक पत्र लिहून हा निर्णय रोखण्याची विनंती केली आहे. सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष सी अग्रवाल यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून खटल्याची…

Read More

मुंबईची ४२ व्या विजेतेपदाकडे जोरदार वाटचाल; विदर्भाला विजयासाठी ५३८ धावांचे तगडे आव्हान

मुंबई | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मुशीर खानचे शतक व अजिंक्य रहाणे, शम्स मुलाणी व श्रेयस अय्यरची तुफानी अर्धशतके यांच्या जोरावर यजमान मुंबईने रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीत आपल्या दुसऱ्या डावात सर्वबाद ४१८ धावा केल्या. आता विदर्भसमोर विजयासाठी ५३८ धावा करण्याचे आव्हान असून सामन्याचे दोन दिवस अद्याप बाकी आहेत. मुंबई विक्रमी विजेतेपदाच्या…

Read More

डबल महाराष्ट्र केशरी चंद्रहार पाटील यांनी बांधले शिव बंधन; ५०० गाड्यांच्या ताफ्यासह मातोश्रीवर !

मुंबई | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – सांगली लोकसभा मतदार संघातील युवा, तड़फदार, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या मातोश्रीवरील पक्षप्रवेशाच्या सोहळ्याला त्यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. सुमारे ५०० गाड्यांचा मोठा ताफा आणि असंख्य कार्यकर्त्यांची गर्दी यावेळी मातोश्रीवर जमली. याप्रसंगी चंद्रहार पाटील समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अबकी बार चंद्रहार, अशा घोषणांनी मातोश्री…

Read More

अखेर वसंत मोरेंकडून मनसेला जय महाराष्ट्र ; रात्री ‘एक्स’ वर व्यक्त केली होती नाराजी

पुणे | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज )– महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस पुणे शहराचे विद्यमान नगरसेवक वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. रात्री फेसबुकवरुन त्यांनी एक पोस्ट केली होती की, ‘आता मला कोणाकडुनही अपेक्षा नाही’. त्यानंतर या पोस्ट वरुन वेगवेगळे तर्क वितर्क निघू लागले. दुपारी ‘साहेब मला माफ करा जय महाराष्ट्र’, अशी एक नवीन…

Read More

जिल्ह्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्पास मंजुरी

मुंबई | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -राज्यातील जिल्ह्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी जागतिक बँक सहाय्यित महाराष्ट्र जिल्हास्तरीय विकासास चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प (Maharashtra Strengthening Institutional Capabilities in Districts for Enabling Growth Project MahaSTRIDE) राबविण्यास तत्वतः मान्यता देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सह्याद्री अतिथीगृह…

Read More
error: Content is protected !!