जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडील पुरामुळे बाधित झालेल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी व घरगुती कुटुंबीय अशा एकूण ३७ नागरिकांशी संवाद साधला.
या प्रसंगी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश दामू भोळे, आमदार किशोर पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल जावळे हे उपस्थित होते.
जळगाव विमानतळावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांचीही उपस्थिती होती.
