राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी संदर्भात सुकाणू समितीची बैठक

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी) प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. याबाबत महाविद्यालय आणि विद्यापीठांचे एनईपी अंमलबजावणी संदर्भात मूल्यमापन करावे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी सांगितले. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई, चर्चगेट येथे आज राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी संदर्भात गठीत केलेल्या सुकाणू समितीची…

Read More

धक्कादायक : एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेत दोन मुलांवर लैंगिक अत्याचार ! आरोपींना पोलिस कोठडी

पुणे ( वास्तव पोस्ट ) : आळंदी येथील खासगी वारकरी शिक्षण संस्थेत दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना नुकतीच उघड झाली आहे. या धक्कादायक या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अत्याचाराचा आरोप संस्थाचालकाच्या मेव्हण्यावर करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पिंपरी चिंचवड पोलिस डीसीपी शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read More

मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी आर्टीच्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा : व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे यांचे आवाहन

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मातंग समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक असा सर्वांगीण विकास करण्यासाठी अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (आर्टी) स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेची नोंदणी पूर्ण झाली असून, मातंग समाज आणि त्यातील तत्सम जातींच्या उन्नतीकरिता विविध कौशल्य प्रशिक्षण, स्पर्धा पूर्व प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी मातंग समाजातील उमेदवारांनी…

Read More

जळगाव विमानतळ येथे नवीन टर्मिनल इमारत तयार करा ; राज्यातील विमानतळांच्या कामाला वेग द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील विमानतळांसंदर्भात आढावा बैठक झाली. बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या विमानतळांच्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने विमानतळांसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करणे अतिशय गरजेचे आहे. देश…

Read More

लोकायुक्तांकडून राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना कामकाजासंबंधीचा अहवाल सादर

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्याचे लोक आयुक्त न्या.वि.मु. कानडे (नि.) व उप लोक आयुक्त संजय भाटिया यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेऊन त्यांना आपल्या कामकाजासंबंधीचा ५१ वा वार्षिक एकत्रित अहवाल सादर केला. लोकायुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार २०२३ या अहवालाधीन वर्षात लोकायुक्त कार्यालयाकडे ४ हजार ७९० नवीन तक्रारी नोंदविण्यात आल्या….

Read More

संविधान व कायद्यांबाबत जन जागरुकतेसाठी विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : लोकशाहीचे बळकटीकरण, सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी भारतीय संविधान आणि देशाच्या नियम-कायद्यांबाबत नागरिकांमध्ये जागरुकता असणे आवश्यक आहे. ही जागरुकता निर्माण करण्यासह समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित पीडित बांधवांना त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, न्यायप्रिय वकिल म्हणून भविष्यात महत्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील…

Read More

‘पॉक्सो अंतर्गत गुन्ह्यांच्या तपासात पीडितांची ओळख गुप्त राहील याची दक्षता घ्या” : डॉ. गोऱ्हे यांच्या सूचना

कोल्हापूर ( वास्तव पोस्ट ) : महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे गुन्हे निकाली काढून आरोपींचा तातडीने शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करा, महिलांची फसवणूक करणाऱ्यांची साखळी तोडून काढा, पोलीस यंत्रणांनी महिला अत्याचारासंदर्भातील गुन्ह्यांमागील कारणांचा शोध घ्यावा, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. कोल्हापूर दौऱ्यांतर्गत, कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांमधील महिला अत्याचार विषयक गुन्ह्यांचे प्रतिबंध करण्याबाबत केलेली…

Read More

देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात जैन समाजाचा मोठा वाटा : मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर ( वास्तव पोस्ट ) : अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याबरोबरच समाजाला आपल्याला काय देता येईल, याचा विचार जैन समाज करतो. या सामाजिक उत्तरदायित्वासह देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात जैन समाजाचा मोठा वाटा असून भारताच्या आर्थिक विकासयात्रेतही अनन्यसाधारण योगदान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी केले. जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या नागपूर विभागाच्या नवीन व्यवस्थापन समिती, महिला आणि…

Read More

शिक्षणमंत्री दादा भूसे यांच्या सोबत राज्यातील शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : आज मुंबईतील जय हिंद कॉलेज येथे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, आणि कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षणाच्या दृष्टीने शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांवर सखोल चर्चा करण्यात आली. या प्रसंगी ६३ शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते….

Read More

मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज मंत्रालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. या प्रसंगी त्यांनी सावित्रीबाईंच्या शिक्षण आणि स्त्री सक्षमीकरणातील अद्वितीय योगदानाचे स्मरण करून, त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि…

Read More

महाराष्ट्र पोलीस दलाचे शौर्य अतुलनीय : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन’ साजरा करण्यात आला. पोलीस दलाचे शौर्य अतुलनीय असून हे देशातील आदर्श पोलीस दल असल्याचे प्रतिपादन राज्यपाल राधाकृष्णन यांनी केले. गोरेगाव येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबईचे पोलीस…

Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पदभार स्वीकारला

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : शिवसेनेचे जळगाव ग्रामीण विधानसभेचे आमदार मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रालयातील दालनात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा पदभार स्वीकारला. पाणीपुरवठा विभागातील प्रगतीपथावरील कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर देत ग्रामीण भागातील जनतेला नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासंदर्भातील कामांना गती देणार असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले. मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले…

Read More

दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात सर्वांगीण विकास कार्य ; पंतप्रधानांकडून महाराष्ट्र सरकारची प्रशंसा !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येत असलेल्या विविध प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. नववर्षाच्या प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला गडचिरोली दौरा हा येथील नागरिकांच्या आयुष्यात सुख-समाधान आणण्यासह सकारात्मक बदल घडवून आणेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’च्या…

Read More

मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काऊंटरही ! वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दररोज काहीतरी नवीन बातम्या या प्रकरणात समोर येत आहेत. वाल्मिक कराड यांना खंडणीच्या आरोपामध्ये व हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण आल्यानंतर त्याला केज…

Read More

शारीरिक लढा संपला, पण मानसिक लढा अद्याप सुरूच : ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन

पुणे ( वास्तव पोस्ट ) : ‘सध्या समाजासमाजात भेदाभेद, जातिभेद या विषमतेने पुन्हा डोके वर काढले आहे. पूर्वीची परिस्थितीशी तुलना करता केवळ शारीरिक संघर्ष संपला आहे. मात्र, मानसिक पातळीवर अद्याप संघर्ष सुरू असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनाच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी आले असताना म्हटले आहे. यावेळी ॲड.आंबेडकर म्हणाले…

Read More
error: Content is protected !!