‘या’ जिल्ह्यांमध्ये पुन्हा अवकाळी पाऊस व गारपीट ; हवामान विभागाचा इशारा

शेतकऱ्यांची चिंता वाढली… नागपूरला ऑरेंज अलर्ट ! पुणे | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – उन्हाळ्याचा कडाका जाणवू लागला असतांनाच राज्यातील हवामानात बदल झाल्याने काही भागत पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मार्चच्या मध्यात काही जिल्ह्यांचा पारा ३५ ते ४० पर्यंत पोहचले आहे. दुसरीकडे मात्र हवामान खात्याने विदर्भात काही भागात अवकाळीचा इशारा…

Read More

मुंबई महानगराच्या अत्याधुनिक नागरी व्यवस्थापनासाठी “थ्री डी मॅपिंग” करण्याची कार्यवाही सुरू

मुंबई | दि. १५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पूर्व उपनगरे, आश्विनी भिडे यांच्या हस्ते आज वांद्रे कुर्ला संकुल येथे थ्री डी मॅपिंगचा शुभारंभ करण्यात आला. जिओस्पेशिअल तंत्रज्ञानाचा वापर करून हे त्रिमितीय अर्थात थ्री डी मॅपिंग (डिजीटल ट्वीन) केले जाणार आहे. त्यामध्ये मुंबईतील महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागांचे मिळून ५०० चौरस किलोमीटर…

Read More

अनिल परब यांचे दापोली येथील रिसॉर्ट पाडण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश

रत्नागिरी | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज )– अनिल परब यांचे दापोलीमधील साई रिसॉर्ट पडणार हे आता निश्चित झाले आहे. साई रिसॉर्ट अनधिकृत असल्याचे हायकोर्टामधील सुनावणीदरम्यान स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनिल परब आणि सदानंद कदम यांना चार आठवड्यात हा रिसॉर्ट पाडा असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०२० मध्ये या…

Read More

मुंबईतील ८ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यास मंत्रिमंडळाकडून आजच्या बैठकीत ग्रीन सिग्नल

मुंबई | दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईतील ८ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रिटिश कालीन नावं असलेल्या या रेल्वे स्थानकांचे आता नामकरण केले जाणार आहे. मुंबईतील ज्या ८ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यास मान्यता मिळाली आहे त्यात, करी रोड रेल्वे स्थानकाचे नाव लालबाग असं केले जाणार…

Read More

अहमदनगर शहराचे नामांतर; आता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या नावाने ओळखलं जाणार ‘नगर’

मुंबई | दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत अहमदनगर शहराच्या नामांतराबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. अहमदनगर शहराला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी विविध पक्षाच्या नेत्यांकडून तसेच कार्यकर्त्यांकडून केली जात होती. अखेर सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अहमदनगर शहराचं नामांतर…

Read More

जिल्ह्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्पास मंजुरी

मुंबई | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -राज्यातील जिल्ह्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी जागतिक बँक सहाय्यित महाराष्ट्र जिल्हास्तरीय विकासास चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प (Maharashtra Strengthening Institutional Capabilities in Districts for Enabling Growth Project MahaSTRIDE) राबविण्यास तत्वतः मान्यता देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सह्याद्री अतिथीगृह…

Read More

महसूल विभागातील पदनामे सन्मान वाढवणारी करावीत ; महसूल मंत्री विखे पाटील

मुंबई | दि. ११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राज्यातील महसूल विभागातील काही पदांची पदनामे ही ब्रिटिशकालीन असून अशी पदनामे बदलून कर्मचाऱ्यांचा सन्मान वाढवणारी पदनामे करावीत, असे निर्देश महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यांसाठी राज्याचे महसूल मंत्री श्री. विखे पाटील…

Read More

देशात १० नव्या वंदे भारत एक्स्प्रेस धावणार ; महाराष्ट्राला मिळणार दोन हायस्पीड ट्रेन ?

पुणे | दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – देशात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेन महाराष्ट्रातून मुंबई- गांधीनगर दरम्यान सुरु झाली होती. त्यानंतर राज्यातील मुंबई-पुणे-सोलापूर, मुंबईवरुन शिर्डी, मुंबई-गोवा, मुंबई-जालना, नागपूर ते बिलासपूर या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु आहे. देशात आणखी दहा वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होत आहे. त्यातील दोन एक्स्प्रेस महाराष्ट्रातून…

Read More

नागपूर येथील भाजपच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

नागपूर | दि.०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – भाजपतर्फे बांधकाम कामगारांसाठी आयोजित शिबीरात एकच गोंधळ झाल्याने कार्यक्रमस्थळी चेंगराचेंगरी झाली. त्यात एका ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू तर अनेक महिला ह्या जखमी झाल्या आहेत. मनूबाई तुळशीराम राजपूत ,रा. आशीर्वाद नगर असे या मृतक महिलेचे नाव आहे. सविस्तर निवृत्त असे की आज शनिवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास…

Read More

माझ्या कंपनीवर ईडी ने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का?

मुंबई | दि.०८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. आज मात्र ईडीने पवारांच्या बारामती ॲग्रोशी संबंधित संपत्ती जप्त केली आहे. या कारवाईमुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. ईडीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट टाकून याबाबत भाष्य केले आहे. या कारवाईनंतर…

Read More

मराठा आरक्षणा संदर्भात राज्य सरकारला न्यायालयाचे महत्वाचे निर्देश

मुंबई | दि. ०८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकाराने मराठा समाजाला दिलेल्या १० टक्के आरक्षण कायद्याला विरोध करणाऱ्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. यावेळी मराठा आरक्षणानुसार भरती प्रक्रिया आणि शैक्षणिक दाखल्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाकडून सरकारला महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. “मराठा आरक्षणानुसार कुठलीही भरती किंवा शैक्षणिक…

Read More

नागपूर येथीलं प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र, बर्ड फ्लू बाधित क्षेत्र म्हणून घोषित

नागपुर | दि.०७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – नागपूर शहरातील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं झाल्याने शहरात बर्ड फ्लूचा धोका वाढला आहे, यामुळे नागरिकांमध्ये मोठी भिति पसरली आहे. या केंद्रातील मृत कोंबड्यांचे नमुने पुणे आणि त्यानंतर भोपाळ येथे पाठवणयात आले होते. या दोन्ही ठिकाणचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला…

Read More

मुंबईला पहिली पॉड टॅक्सी सेवा मिळणार ; ₹ 1,016.38 कोटीच्या प्रकल्पाला दिली मान्यता

मुंबई | दि. ०६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि गजबजलेल्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मधील कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या महत्त्वपूर्ण हालचालीमध्ये, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ऑटोमेटेड रॅपिड ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट सिस्टीमच्या अंमलबजावणीला मान्यता दिली आहे, त्याला पॉड टॅक्सी म्हणून ओळखले जाते. प्रस्तावित प्रणाली, अंदाजे रु. १०१६.३८ कोटी, वांद्रे-कुर्ला रेल्वे मार्गावर ८.८० किलोमीटरचे…

Read More

राज्यात ड्रोन मिशन राबविण्याबाबत आयआयटी-मुंबईसोबत सामंजस्य करार

मुंबई | दि.०६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन व भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (IIT) यांच्या दरम्यान राज्यात ड्रोन मिशन राबविण्याबाबत सामंजस्य करा करण्यत आला. यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याकरता मिशन ड्रोन राबवण्यात…

Read More

पुणे मेट्रोच्या रुबी रुग्णालय ते रामवाडी मार्गाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन

पुणे | दि.०६ (वास्तव पोस्ट न्यूज ) – पुणे मेट्रोच्या रुबी रुग्णालय ते रामवाडी मार्गाचे उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते दूरस्थ माध्यमातून होणार आहे. मेट्रोचा हा मार्ग साडेपाच किलोमीटरचा आहे. या मार्गावर बंडगार्डन, येरवडा, कल्याणी नगर आणि रामवाडी अशी चार स्थानकं आहेत. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये या मार्गावर पहिली चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर आता…

Read More
error: Content is protected !!