SANDIP RANDHE

दिल्लीत आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग ; अग्नीशमन दलाचे २१ वाहने तैनात

दिल्ली | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राष्ट्रीय राजधानीच्या आयटीओ परिसरात असलेल्या सीआर बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावर आयकर कार्यालयास आग लागल्याची घटना घडली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या एकूण २१ गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. २०२४ लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचे वारे घमासान वाहत असताना व दुसरीकडे भाजप सरकारच्या आयटी, ईडी, सीबीआय़वर देशभऱातील विरोधक आरोप…

Read More

वाराणसीत नरेंद्र मोदीं विरुद्ध श्याम रंगीला मैदानात ; शेवटच्या दिवशी दोघांचे उमेदवारी अर्ज दाखल

वाराणसी | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – वाराणसी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून प्रसिद्ध कॉमेडियन श्याम रंगीलाने अर्ज दाखल केला आहे. शेवटच्या टप्प्यात म्हणजे १जून रोजी वाराणसीत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी १४ मे ही शेवटची तारीख होती. याच मतदारसंघातून नरेंद्र मोदी हे देखील उमेदवार आहेत. उत्तर प्रदेशात सर्वाधिक ८०…

Read More

होर्डिंग दुर्घटनेत मृतांची संख्या ८ वर ! मृतांचा आकडा वाढण्याची भिती; मदतकार्य सुरुच

मुंबई | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या अपघातात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे. या घटनेत ६६ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी अद्याप मदतकार्य सुरु असून घटनास्थळी अजूनही २५ ते ३० जण अडकल्याची माहितीही…

Read More

EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाखल ; आता लक्ष निर्णयाकडे !

नवी दिल्ली | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – EVM-VVPAT प्रकरणाच्या २६ एप्रिलच्या निकालाला आव्हान देणारी पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. फेटाळण्यात आलेल्या याचिकांमध्ये व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) रेकॉर्डसह इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) डेटाच्या १०० टक्के क्रॉस-व्हेरिफिकेशनची मागणी करण्यात आली होती. अरुण कुमार अग्रवाल यांनी ही याचिका दाखल केली…

Read More

अवकाळीने मुंबईला झोडपले ! मध्य रेल्वे सेवा ठप्प

मुंबई | दि. १३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – ठाणे येथे वादळी वाऱ्यासह आलेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. मुलुंड आणि ठाण्याच्या दरम्यान ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूकही बंद झाली आहे. यामुळे, लोकल सेवेच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. अचानक आलेल्या या वादळी अवकाळीमुळे मुलुंड ठाणे दरम्यान ओव्हर हेड खांब…

Read More

गर्भनिदान करणारं रॅकेट उद्ध्वस्त; १९ वर्षीय इंजिनिअरींगची तरुणी मास्टरमाईंड

छत्रपती संभाजीनगर | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मातृदिनी गर्भलिंग निदान करत असल्याच्या संशयावरून महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने मोठी कारवाई केली आहे. गर्भलिंग निदान करणे हा कायद्याने गुन्हा असुन गर्भनिदान करणारे एक रॅकेटच उद्ध्वस्त केले आहे. या कार्रवाईत एक १९ वर्षीय इंजिनिअरींगला असणारी तरुणी आपल्या राहत्या घरात लिंग निदान करत असल्याची…

Read More

अहमदनगर येथे जुन्या वादातुन दोन गटात राडा; पोलिस बंदोबस्त तैनात

अहमदनगर | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यासह ११ मतदारसंघात चौथ्या टप्प्यात मतदान होत आहे. पक्षाचे नेते व पदाधिकारी घरोघरी भेटी देत आहेत. उद्याच्या दिवशी जास्तीत जास्त संख्येने मतदान होईल याकरीता नियोजन सुरु आहे. दरम्यान, मतदानाला एक दिवस बाकी असतानाच नगर…

Read More

कोरोनाचा नवा व्हेरियंट केपी २ (फ्लर्ट) हा राज्यात दाखल

मुंबई | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राज्यात कोरोनाचा जेएन १ नंतरचा नवा व्हेरियंट केपी २ (फ्लर्ट) हा दाखल झाला असून या नव्या व्हेरियंटचे राज्यात आतापर्यंत एकूण ९१ रुग्ण आढळून आले आहेत. मात्र नागरिकांनी काळजी करू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, जे लोक आधीच मधुमेह, हायपरटेन्शन, हृदयविकार यांसारख्या…

Read More

मतदान होताच कांद्याच्या दरात मोठी घसरण ; बळीराजाला मोठा फटका

सोलापूर | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दारफळ येथे कांद्याला अत्यंत कमी दर मिळाला आहे. येथे एका शेतकऱ्याच्या ९३ कांद्याच्या पिशव्याची पट्टी फक्त १०००० रुपये आली आहे. त्यांच्या कांद्याला प्रतिकिलो १ ते ६ रुपयांचा दर मिळालाय. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे. कांदा…

Read More

सुरेश जैन यांचा महायुतीस पाठींबा ; ठाकरे गटास धक्का

जळगाव | दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पाचव्या टप्प्यात जळगाव लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. मतदानाला दोन दिवस असतांनाच उद्धव ठाकरे गटास मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुरेश जैन यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आज दि.११ रोजी भाजपसह महायुतीच्या उमेदवारांना पाठींबा दिल्याचे घोषित…

Read More

युवा आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत पुण्याच्या आकाशला सुवर्ण पदक

पुणे | दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – कझाकिस्तानमध्ये अस्तानात २२ वर्षांखालील युवा आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत पुण्याच्या आकाश गोरखाने सुवर्णपदक पटकावले. या मुष्टियुद्ध स्पर्धेत २२ वर्षांखालील गटामध्ये वर्चस्व राखत २१ पदकांसह एकूण ४३ पदकांची कमाई केली. पुण्याच्या आकाशने ६० किलो गटाच्या अंतिम लढतीत कझाकिस्तानच्या रस्लन कुझेउबाएवचा ४-१ असा पराभव करून विजेतेपद जिंकले. मागील वर्षी…

Read More

अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामिन मंजूर ; प्रचारासाठी लवकरच मैदानात

नवी दिल्ली | दि१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. आज संध्याकाळपर्यंत केजरीवाल बाहेर येण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनमुळे आम आदमी पक्ष तसेच इंडिया आघाडीला मोठा फायदा होणार आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान आपल्याला प्रचार करण्याची…

Read More

नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात दोन आरोपींना सश्रम जन्मठेप ; सबळ पुराव्याअभावी तीन निर्दोष

पुणे | दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात पाच आरोपींपैकी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर ज्यांच्यावर कट रचल्याचा आरोप होता त्या वीरेंद्र तावडेसह संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या तीघांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले….

Read More

राज्यातील राजकीय गोंधळ दूर करण्यासाठी मशाल पेटवाविच लागेल : आदित्य ठाकरे

कर्जत | दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मावळ लोकसभा महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे ह्यांच्या प्रचारार्थ कर्जतमधील टिळक चौकात घेण्यात आलेल्या जाहीर सभेत युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते. ह्यावेळी प्रत्येक राज्यात निर्माण झालेली अस्थिरता, राजकीय गोंधळ दूर करण्यासाठी आपल्याला मशाल पेटवावीच लागेल, असं आवाहन आदित्य…

Read More

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता

मुंबई | दि.९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महाराष्ट्रात नागरिक उष्णतेच्या लाटेने हैराण असतांनाच पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पूर्व विदर्भात गारपीट तसेच वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊसाने हजेरी लावली आहे. विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात काही भागात आज अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता…

Read More
error: Content is protected !!