SANDIP RANDHE

कोविड 19 नंतर चीनमध्ये आणखी एका व्ह्यायरसचा उद्रेक ! रुग्णालयांमध्ये गर्दी !

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : चीनमध्ये पाच वर्षांनंतर आणखी एका धोकादायक विषाणूने हाहाकार माजवला आहे. ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) असे या विषाणूचे नाव असून कोरोना व्हायरस इतकाच हा संसर्गजन्य आणि जीवघेणा असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. इन्फ्लूएन्झा ए, एचएमपीव्ही, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि कोविड-१९ विषाणू वेगाने पसरत आहेत. रुग्णालयामध्ये…

Read More

दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या स्मारकाची प्रक्रिया सुरु

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : माजी पंतप्रधान दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ स्मारक बनवण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली आहे. स्मारकासाठी काही स्थानांची पाहणी करण्यात आली असून, डॉ. सिंग यांच्या कुटुंबीयांना यापैकी एक ठिकाण निवडण्यास सांगण्यात आले आहे. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (सीपीडब्ल्यूडी) अधिकाऱ्यांनी राजघाट, राष्ट्रीय स्मृतीस्थळ आणि किसान घाटच्या आजूबाजूच्या परिसराचा…

Read More

महाराष्ट्र पोलीस दलाचे शौर्य अतुलनीय : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन’ साजरा करण्यात आला. पोलीस दलाचे शौर्य अतुलनीय असून हे देशातील आदर्श पोलीस दल असल्याचे प्रतिपादन राज्यपाल राधाकृष्णन यांनी केले. गोरेगाव येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबईचे पोलीस…

Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पदभार स्वीकारला

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : शिवसेनेचे जळगाव ग्रामीण विधानसभेचे आमदार मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रालयातील दालनात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा पदभार स्वीकारला. पाणीपुरवठा विभागातील प्रगतीपथावरील कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर देत ग्रामीण भागातील जनतेला नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासंदर्भातील कामांना गती देणार असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले. मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले…

Read More

दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात सर्वांगीण विकास कार्य ; पंतप्रधानांकडून महाराष्ट्र सरकारची प्रशंसा !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येत असलेल्या विविध प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. नववर्षाच्या प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला गडचिरोली दौरा हा येथील नागरिकांच्या आयुष्यात सुख-समाधान आणण्यासह सकारात्मक बदल घडवून आणेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’च्या…

Read More

मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काऊंटरही ! वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दररोज काहीतरी नवीन बातम्या या प्रकरणात समोर येत आहेत. वाल्मिक कराड यांना खंडणीच्या आरोपामध्ये व हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण आल्यानंतर त्याला केज…

Read More

शारीरिक लढा संपला, पण मानसिक लढा अद्याप सुरूच : ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन

पुणे ( वास्तव पोस्ट ) : ‘सध्या समाजासमाजात भेदाभेद, जातिभेद या विषमतेने पुन्हा डोके वर काढले आहे. पूर्वीची परिस्थितीशी तुलना करता केवळ शारीरिक संघर्ष संपला आहे. मात्र, मानसिक पातळीवर अद्याप संघर्ष सुरू असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनाच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी आले असताना म्हटले आहे. यावेळी ॲड.आंबेडकर म्हणाले…

Read More

देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून गिफ्ट ! DAP चे दर वाढनार नाही

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. डीएपीच्या दरात कोणतीही वाढ होणार नसून ५० किलोची पिशवी १३५० रुपयांना मिळत राहणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या गरजेनुसार प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीक…

Read More

केरळ चे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केला नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : भारतीय जनता पक्षाचे नेते तथा महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केरळ राज्याचा “मिनी पाकिस्तान” असा उल्लेख केल्याबद्दल सत्ताधारी आघाडी आणि विरोधकांची टीका केली आहे. केरळ हे मिनी पाकिस्तान आहे म्हणून राहुल गांधींची बहीण तिथे निवडून आली, सगळे अतिरेकी त्यांना मतदान करतात. अतिरेकी लोकांना धरूनच हे लोक…

Read More

ग्लेन मॅक्सवेलने पकडला अफलातून झेल… ! बघा ‘तो’ व्हिडिओ

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : क्रिकेट कोणतेही असो आज प्रत्येक खेळाडू क्रिकेटच्या मैदानावर प्रत्येक क्षेत्रात आपले शंभर टक्के योगदान देत असतो. यातच आपल्याल्या त्यांच्याकडून मैदानावर अनेक चमत्कार बघायला मिळत असतात. ग्लेन मॅक्सवेलने आज असाच एक पराक्रम केला. ग्लेन मॅक्सवेलने घेतलेला अविश्वसनीय वाटेल असा ‘तो’ झेल क्रिकेट जगताने बघितला. बिग बॅश लीगमध्ये ग्लेन मॅक्सवेलने हा…

Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्तदान करुन केले नववर्षाचे स्वागत

ठाणे ( वास्तव पोस्ट ) : धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेले तसेच शिवसेना ठाणे शाखा आणि ‘रक्तानंद’ ग्रुपच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराचे यंदा ३० वे वर्ष असून यानिमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्तदान करून २०२५ या नवीन वर्षाचे स्वागत केले. यावेळी दरवर्षी या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना ‘रक्तानंद’ पुरस्कार…

Read More

धान-भरडधान्य खरेदीच्या नोंदणीस १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ : मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : शासकीय खरेदी केंद्रावर धान/भरडधान्य विक्रीसाठी शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्याकरिता ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत होती. मात्र अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने विविध लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार शासनाने नोंदणीसाठी १५ जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा…

Read More

क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन

पुणे ( वास्तव पोस्ट ) : पेरणे येथील विजयस्तंभ हे एक प्रेरणास्थान असून देशातील, राज्यातील लाखो अनुयायी येथे अभिवादनासाठी येत असतात. येणाऱ्या अनुयायांसाठी प्रशासनाकडून चांगल्या प्रकारच्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, असे विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधतांना क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. मंत्री दत्तात्रय भरणे यांनी…

Read More

ग्रामीण भागात रस्त्यांच्या कामात पारदर्शकता व गुवत्तेला महत्व द्यावे : मंत्री जयकुमार गोरे

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : ‘प्रधानमंत्री ग्राम सडक योजना’ व ‘मुख्यमंत्री ग्राम सडक योजने’च्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामात पारदर्शक व गुणवत्तापूर्ण कामाला प्राधान्य द्यावे, असे निर्देश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. मंत्रालयात प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या तसेच कंत्राटी कामगार वेतन थकबाकीबाबत आढावा बैठक झाली….

Read More

पुढील १०० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने सह्याद्रीवर आढावा बैठक

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथिगृह येथे येणाऱ्या १०० दिवसांत करावयाच्या कामाच्या अनुषंगाने आढावा घेतला. यामध्ये त्यांनी परिवहन, सांस्कृतिक कार्य, ग्रामविकास, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि वस्त्रोद्योग विभागांना उपयुक्त सूचना दिल्या. यावेळी थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजनेंतर्गत संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेचे…

Read More
error: Content is protected !!