Headlines

अतिवृष्टीच्या पार्श्वभुमीवर मुंबई ठाण्यासह काही जिल्ह्यातील शाळांना उद्या सूटी जाहीर

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाने थैमान घातले असुन अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढल्याने नद्या नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत देखील वाढ झाली आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे रस्ते जलमय झाले आहेत. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत पावसाने सर्वांचीच त्रेधा उडल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पाणी देखील साचलं आहे. दरम्यान मुसळधार…

Read More

मुख्यमंत्री यांनी दिली नियंत्रण कक्षाला भेट ; हवामान खात्याकडून मुंबईस ऑरेंज अलर्ट !

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी शहराला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला असल्याने गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे मुख्यमंत्री यांनी मुंबईकरांना आवाहन केले. यावेळी मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री…

Read More

धावत्या लोकलमधुन महिला रुळावर पडली ; जीव वाचला पण दोन्ही पाय गमावले !

नवी मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मुंबईसह उपनगरात रविवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा मोठा फटका मुंबईच्या लोकल सेवेला बसला आहे. ठिकठिकाणी रुळांवर पाणी साचल्याने लोकलसेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. मिळेल ती लोकल पकडून प्रवासी जीवघेणा प्रवास करीत आहेत. अशातच नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना…

Read More

किलबिल बालक मंदिर शाळेत पालक सभा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश काॅलेज एज्युकेशन सोसायटी संचालित किलबिल बालक मंदिर शाळेमध्ये नर्सरी या वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांची सभा झाली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक उपस्थित होत्या. किलबिल शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना नेमाडे यांनी शाळेतील कामकाजाची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबाबत मार्गदर्शन केले. प्रतिभा जोशी…

Read More

ए. टी. झांबरे विद्यालयात कालिदास जयंती साजरी

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात महाकवी कालिदास जयंतीनिमित्त ‘आषाढस्य प्रथमदिवसे’ कार्यक्रम झाला. आषाढाच्या पहिल्या दिवशी ‘महाकवी कालिदास दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन, सूत्रसंचालन, प्रास्ताविक, कथाकथन आणि आभार आदी जबाबदारी इयत्ता १० वी क च्या विद्यार्थ्यांनी सांभाळली. यात तुषार पाटील, दिगंबर पाटील,…

Read More

गहुले सातगावातील पदाधिकारी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात दाखल

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : तालुक्यातील गहुले सातगाव येथील विविध पदाधिकार्‍यांनी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला असून वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी त्यांचे स्वागत केले. दिवसेंदिवस शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेणार्‍यांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढतांना दिसून येत आहे. यातच आता गहुले सातगाव येथील मान्यवरांचे इनकमींग झाले. यात प्रामुख्याने अजरोद्दीन जैनोद्दिन तडवी, जिभाऊ…

Read More

दुसऱ्या T20 त टीम इंडियाकडून झिम्बाब्वेला जोरदार दणका ; १०० धावांनी मोठा विजय

हरारे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भारतीय संघ सध्या शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वे येथे आज ७ जुलै टीम इंडिया आणि झिम्बाब्वे संघांमध्ये ५ टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम फंलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर टीम इंडियाने २० षटकात २ बाद २३४ धावांचा डोंगर उभारला. झिम्बाब्वेला विजयासाठी २३५…

Read More

अनुभूती निवासी स्कूल मध्ये ‘फेशर्स डे’ साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, संगीत यासह सांस्कृतिक कार्यक्रमांनी अनुभूती निवासी स्कूलच्या स्थापना दिनानिमित्त ‘फेशर्स डे’ साजरा केला. अनुभूती निवासी स्कूलचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी एकमेकांमधील निर्भरता वाढावी, आंत्रपिनर्स निर्माण व्हावे यादृष्टीने अनुभूती निवासी स्कूल ही अनुभवाधारीत शिक्षण देणारी सीआयसीएसई या पॅटर्नची कान्हदेशातील एकमेव स्कूल सुरू केली….

Read More

पं. स्व. वसंतराव चांदोरकर यांच्या स्मृती दिनानिमित्त ‘विरासत’ मैफिलीत रसिक चिंब

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने पं. वसंतराव चांदोरकरांच्या २३ व्या स्मृती दिनाच्या पूर्व संध्येस म्हणजे रविवार दि. ७ जुलै २०२४ “विरासत” मैफिलीचे आयोजन केले होते. या मैफिलीस भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनचे सहकार्य लाभले होते. कांताई सभागृहात रंगलेल्या मैफिलीची सुरवात प्रतिष्ठानच्या परंपरेनुसार दीपक चांदोरकर यांच्या गुरुवंनदनेने झाली….

Read More

ऊर्जा विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय ; मुळ वेतन आणि भत्त्यांत मोठी वाढ

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि., महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि., महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लि. आदींमधील अधिकारी व कर्मचारी यांच्या मूळ वेतनात १९ टक्के व सर्व भत्त्यांमध्ये २५ टक्के वाढ देण्यात येत असल्याचे उमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत, कर्मचारी…

Read More

जैन इरिगेशनच्या सहकार्यातून १००० झाडांची लागवड ; वनमहोत्सवात सुरत रेल्वे गेट पासून निमखेडी रोडने झाडे जगविणार

जैन इरिगेशनच्या सहकार्यातून वृक्षारोपणाप्रसंगी (डावीकडून) ॲड सुनील खैरनार, डॉ. नितीन विसपूते, प्रविण पाटील, राजेंद्र राणे, रोहिणी सोनार, संगिता नाईक, मनिषा पाटील, उदय पाटील, मनोज देशमुख, प्रकाश पाटील, सी. एस. नाईक, श्री.लुंकड, वसंत पाटील, मदन लाठी, जे. एम. तापडिया, संजय ठाकरे व मान्यवर जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जैन इरिगेशन सिस्टीम्स व सामाजिक वनिकरण…

Read More

चॅम्पियन्सचा विजरथ थांबला ! पहिल्या T-20 त झिम्बाब्वेकडून टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव

ZIM vs IND T20I : झिम्बाब्वेने भारताला विजयासाठी ११६ धावांचे माफक आव्हान देऊन, प्रत्युतरात भारतास १०२ धावांवर गुंडाळत विद्यमान विश्वविजेत्या संघाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-२० सामना १३ धावांनी जिंकला. झिम्बाब्वे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात झाली. पहिला सामना शनिवारी दुपारी साडेचार वाजल्यापासून हरारे स्पोर्ट्स…

Read More

मोबाईलवर रील बनविण्याच्या नादात एका तरुणाने गमावला आपला जीव !

धुळे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : आजकाल सोशल मीडियावर रील्स आणि स्टंट्स बनवण्याची क्रेझ तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे. मात्र, ही क्रेझ अनेकदा त्यांच्यासाठी जीवघेणी ठरते. अशाच एका घटनेत दुचाकीवर धोकादायक स्टंट करताना एका तरुणाला आपला जीव गमावावा लागला आहे. धुळे-सोलापूर महामार्गावरील बीड बायपासवर दुचाकीचा भीषण अपघात झाला. हा अपघात दुचाकीवर स्टंट…

Read More

मू.जे.महाविद्यालयातमहाकवी कालिदास जयंती साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : संस्कृत भाषेचे महाकवी व कविकुलगुरु कालिदास मेघदूत, रघुवंश, अभिज्ञान शाकुंतम् सारखे महाकाव्य व नाटकांचे रचनाकार यांचे साहित्य काव्य हे जगामध्ये अजरामर झाले आहे. अशा महान कवीची जयंती मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयात संस्कृत विभाग व साहित्य कला आणि सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली. त्यांच्या कार्याचा व…

Read More

१५ व्या कृषी नेतृत्व समितीचा ‘सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार’ महाराष्ट्रास जाहीर

Best Agricultural State : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यात कृषी विषयक क्रांतिकारी पावले उचलली आहेत. त्यांच्या या पावलांमुळेच हा प्रतिष्ठेच्या मानांकित पुरस्कारावर महाराष्ट्राचे नाव कोरले गेल्याचे पटेल यांनी नमूद केले आहे. नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा सर्वोत्कृष्ट…

Read More
Top
error: Content is protected !!