Headlines

पहिल्या टी-20 त भारताचा श्रीलंकेवर ४३ धावांनी विजय ; सूर्या आणि रियान चमकले

श्रीलंका ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातला पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना पल्लेकेले स्टेडियमवर खेळला गेला. टी-20 चा नवीन कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने श्रीलंका दौऱ्याची सुरुवात विजयाने केली आहे. टीम इंडियाने टी-20 मालिकेतील पहिला सामना ४३ धावांनी जिंकला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी मिळाल्यावर टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी २१४ धावांचे…

Read More

‘ओजस्विनी’ च्या ए.टी.डी. चा निकाल १०० टक्के

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओजस्विनी कला महाविद्यालयाच्या वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून हा निकाल १०० टक्के लागला आहे. ए.टी.डी. च्या प्रथम वर्षाच्या वार्षिक परीक्षेत दिपल प्रदीप टापरे हिने प्रथम श्रेणी मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. फाउंडेशनच्या वार्षिक परीक्षेत मयूर सोपान पाटील (प्रथम श्रेणी) याने प्रथम क्रमांक प्राप्त…

Read More

शिक्षकांच्या समस्यांविषयी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी यांचे सोबत चर्चा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे नवनिर्वाचित लोकप्रिय शिक्षक आमदार आदरणीय किशोर भाऊ दराडे प्रचंड मताधिक्यांनी पुन्हा एकदा शिक्षक आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल त्यांचा समता शिक्षक परिषद व माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती जळगाव जिल्हा आयोजित जाहीर सत्कार करण्याविषयी तसेच जळगाव जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विद्यार्थी…

Read More

महामार्गावरील चौकातील वाहतुक समस्यांविषयी राष्ट्रीय महामार्ग, मनपा आणि पोलीस विभागाला जिल्हाधिकारी यांचे पत्र

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : शहरातील आकाशवाणी चौकात महामार्गावरील वाहतुक कोंडी, वारंवार होणारे अपघात यावर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तसेच रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत या मुद्दावर चर्चा झालेली आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी २६ जुलै रोजी विशेष बैठक घेतली. त्यानंतर रस्ता दुरुस्ती संदर्भात प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग, वाहतुक नियमन संदर्भात जळगाव जिल्हा…

Read More

मणियार विधी महाविद्यालयातील व्याख्यानात स्त्री-पुरुष समानता विषयी विचारमंथन

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात विधी व्याख्यानमाला अंतर्गत विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानमालेसाठी प्रमुख वक्ते म्हणून जयपूर येथील मणिपाल विद्यापीठातील विधी विभाग प्रमुख डॉ. विजयालक्ष्मी शर्मा यांनी मार्गदर्शन केले. यात स्त्री-पुरुष समानता विषयी विचारमंथन झाले. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, धुळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी…

Read More

मानव सेवा माध्यमिक विद्यालय जळगाव येथे राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाचा सहावा दिवस संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मानव सेवा माध्यमिक विद्यालय जळगाव येथे आज दि.२७ जुलै २०२४ शनीवार रोजी, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये २२ जुलै ते २८ जुलै २०२४ या कालावधीत शिक्षण सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिक्षण सप्ताह राष्ट्रीय शैक्षणिक…

Read More

पाचोर्‍यात हनुमान भक्तीचा जागर ! उध्दव ठाकरेंच्या वाढदिवशी सामूहिक श्री हनुमान चालीसा पठण

पाचोरा (वास्तव पोस्ट न्यूज ) : शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज पाचोर्‍यात भव्य सामूूहिक श्री हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात हजारो पाचोरेकांनी उत्साहात सहभाग घेतला. उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज पाचोरा-भडगाव मतदारसंघात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील सर्वात भव्य व लक्षवेधी कार्यक्रमाचे पाचोर्‍यातील श्रीराम मंदिराच्या…

Read More

ए.टी.झांबरे विद्यालयात नाटक आणि निबंध स्पर्धा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात कारगिल विजय दिनानिमित्त कारगिल युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानिमित्त विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नाटक सादर केले. विद्यार्थ्यांसाठी निंबंशही स्पर्धा झाली. कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी एन.सी.सी कॅडेट भाग्यश्री पाटील, रुतुजा पाटील, रोहिणी उमाळे, शर्वरी गायकवाड, प्रणाली…

Read More

उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त किरकोळ विक्रेत्यांना छत्रींचे वाटप

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या वतीने शहरातील किरकोळ विक्रेत्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. सध्या पावसाळा सुरू असून फळ तसेच अन्य वस्तूंची किरकोळ विक्री करणार्‍यांना पावसामुळे खूप त्रास होत असतो. याची दखल घेऊन वैशालीताई सुर्यवंशी यांनी आज पाचोरा शहरात…

Read More

मानव सेवा माध्यमिक विद्यालय जळगाव येथे राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाचा पाचवा दिवस संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मानव सेवा माध्यमिक विद्यालय जळगाव येथे आज दि.२६ जुलै २०२४ शुक्रवार रोजी, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये २२ जुलै ते २८ जुलै २०२४ शिक्षण सप्ताह चे आयोजन करण्यात आले. सदर शिक्षण सप्ताह राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या…

Read More

“आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवड” योजनेस रु.४० लाख निधीस मान्यता

Backyard Planting Scheme : राज्यातील आदिवासी जिल्ह्यामध्ये आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीची योजना २०२४-२५ मध्ये राबविण्यास ४० लाखाच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याबाबत शासननिर्णय पारीत करण्यात आला आहे. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत राज्यातील १४ जिल्हयांतील आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने व आदिवासी बांधवांना…

Read More

मू.जे.महाविद्यालयात एनसीसीतर्फे कारगिल विजय दिवस साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा महाविद्यालयात एनसीसी विभागातर्फे २५ व्या कारगिल विजय दिनानिमित्त कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला. कारगिल विजय दिवस ही भारताच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखी घटना आहे. २५ वर्षांपूर्वी पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठिकाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले. त्यानंतर…

Read More

टी-२० महिला आशिया चषकात बांग्लादेशचा दहा गड्यांनी धुव्वा उडवत भारत फायनलमध्ये

T-20 Women’s Asia Cup : भारताने आतापर्यंत स्पर्धेतील सर्व सामने जिंकले आहेत. तसेच सात वेळा ट्रॉफी जिंकणारा भारत हा सर्वात यशस्वी संघ आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाची नजर आता आठव्या विजेतेपदावर असेल. दाम्बुला ( वास्तव पोस्ट न्यूज ) : टीम इंडियाने महिला आशिया कप २०२४ च्या अंतिम फेरीत जोरदार प्रवेश केला आहे. आज झालेल्या…

Read More

जुनी पेन्शन : हा विषय राज्य सरकारच्याच अखत्यारीतला ; केंद्रीय सचिवांचे शुभांगी पाटील यांना पत्र

Old Pension Scheme : शिक्षक व कर्मचाऱ्यांना जूनी पेंशन लागू करावी यासाठी शुभांगी पाटील ह्या प्रयत्नशील आहेत. आता त्यांना केंद्रीय सचिवांचे एक पत्र प्राप्त झाले आहे. त्यात जूनी पेंशन योजना देणे ही राज्यशासनाची जबाबदारी असल्याचे नमूद केले असुन याबाबत राज्यशासनाने योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्यातील…

Read More

राज ठाकरेंची भाजपसोबत मैत्री संपली! मनसे विधानसभेच्या २२५ जागा एकट्याने लढवणार

VIDHAN SABHA 2024 : सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ नोव्हेंबर २०२४ मध्ये संपणार आहे. त्यामुळे राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस १३ खासदारांसह राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. त्यामुळे यावेळच्या विधानसभेत मोठी चुरस बघायला मिळेल. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष…

Read More
Top
error: Content is protected !!