Headlines

शिवणकाम करणाऱ्या दांपत्याची मुलगी धनश्री जिरेमाळी ९५.४० टक्के गुणांसह अनुभूती स्कूलमध्ये प्रथम

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जैन इरिगेशनचे संस्थापक पद्मश्री डॉ.भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या (दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी) भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन संचलीत अनुभूती इंग्लिश मिडिअम स्कूलचा इयत्ता १० वीचा निकाल यंदाही १०० टक्के लागला आहे. यात धनश्री दत्तात्रय जिरेमाळी-प्रथम (९५.४०%), मुकूंद सदाशिव चौधरी – द्वितीय (९५.००%) व अश्विनी समाधान हरसोडे-तृतीय (९३.८० %),…

Read More

शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज कजगाव शाळेची १००% निकालाची परंपरा कायम

कजगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : माध्यमिक शालांत परिक्षेचा इयत्ता १०वी चा निकाल जाहीर झाला असून यामध्ये शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज कजगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकालाने झेंडा रोवला असून शाळेची १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे. सर्व ३३ विद्यार्थी ८०% पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. कु. ममता जगदीश परदेशी ही…

Read More

वाकोद येथे पोलीस भरती प्रशिक्षण व निशुल्क सराव चाचणी; गौराई स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे आयोजन

वाकोद ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्र शासनातर्फे यावर्षी १७४४१ जागांची महापोलीस भरती जाहीर करण्यात आलेली आहे. तसेच येणाऱ्या काळात सरळ सेवा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब, गट क व इतर परीक्षा देखील होणार आहेत. यासाठी भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन द्वारा वाकोद येथे गौराई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील…

Read More

अखेर शिक्षण मंडळाकडून अधिकृत तारखेची घोषणा; १०वी चा निकाल २७ मे रोजी लागणार

पुणे (वास्तव पोस्ट न्यूज) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. जवळपास सर्वच बोर्डाचे निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल २७ मे रोजी दुपारी १:०० वाजता जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, शिक्षण मंडळाकडून अधिकृत…

Read More

राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालय, वाकोद विद्यालयाची यशाची परंपरा कायम

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) :शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी संचालित, राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता १२ वीचा निकाल ९८.१४ टक्के लागला आहे. विद्यालयातून शिवानी ज्ञानेश्वर उबाळे आणि श्रद्धा सदाशिव पाटील या दोन्ही विद्यार्थिनींना ७९.६७ टक्के गुण मिळाले, त्या दोन्ही विद्यार्थीनी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत….

Read More

बन्सीलाल हस्तीमल जैन ज्युनिअर कॉलेज वाकोदचा शंभर टक्के निकाल

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भवरलाल जैन अर्थात मोठ्याभाऊंच्या जन्मगावी वाकोद ला असलेल्या भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन संचलीत बन्सीलाल हस्तीमल जैन ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान शाखेच्या इयत्ता १२ वीच्या पहिल्या बॅचचा निकाल शंभर टक्के लागला. सौरभ प्रकाश देठे ७३ टक्के गुणांसह कॉलेजमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. तर राधिका दीपक काटे ७१.८३ टक्क्यांसह द्वितीय…

Read More

तात्यासाहेब आर.ओ.पाटील विज्ञान, वाणिज्य व कला कनिष्ठ महाविद्यालयाच्या १००% निकालाची परंपरा कायम.

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी- मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इ.१२ वी च्या परीक्षेत तात्यासाहेब आर. ओ.पाटील विज्ञान, वाणिज्य व कला कनिष्ठ महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून दैदीप्यमान यश संपादन केले आहे. अद्वैत प्रवीण पाटील याने ८७.६७% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम, पार्थ…

Read More

अखेर प्रतिक्षा संपली, बारावीचा निकाल उद्या लागणार

पुणे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उद्या म्हणजेच २१मे ला बारावीचा निकाल लागणार असल्याची घोषणा केली आहे. यंदा राज्यामध्ये तब्बल १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये बारावीची परीक्षा दिलेल्या लाखो विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतीक्षा उद्या संपणार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण…

Read More

कजगांव येथील शाळेचे विद्यार्थी भेटले तब्बल २० वर्षाने

कजगाव | दि.१८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) भडगाव तालुक्यातील कजगाव येथे शारदा माध्यमिक विद्यामंदिर व बबनबाई हिरण माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संजय चीला पाटील व अध्यक्षस्थानी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक बी.के पाटील उपस्थित होते. तब्बल वीस वर्षानंतर म्हणजेच शैक्षणिक वर्ष २००३/०४ इयत्ता दहावी चे सर्व विद्यार्थी…

Read More

विद्यापीठाच्या परीक्षांचा पॅटर्न बदलणार ; नवीन शैक्षणिक धोरणानुसार ६०/४० गुणांची परीक्षा

सोलापूर | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज )– विद्यापीठाच्या परीक्षा सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार ८० गुणांची परीक्षा विद्यापीठ स्तरावर तर २० गुणांची परीक्षा महाविद्यालय स्तरावर घेतली जाते. मात्रा यामध्ये आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बदल होणार असुन त्यात आता विद्यापीठाकडून ६० गुणांची तर महाविद्यालयांकडून ४० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०२४-२५) पुण्यश्लोक अहिल्यादेवी…

Read More

सीआयएससीई बारावीच्या बोर्ड परीक्षेत अनुभूती निवासी स्कूलचा निकाल यंदाही १०० टक्के

जळगाव | दि. ६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता १२ वी आयएससीचा निकाल जाहिर झाला असुन यामध्ये अनुभूती निवासी स्कूलच्या १२ वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले. स्कूलच्या स्थापनेपासून १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षी सुद्धा कायम राहिली आहे. सीआयएससीई बोर्डच्या १२ वी इयत्तेत कॉमर्स शाखेतील विद्यार्थी तुषार कावरे हा…

Read More

सीआयएससीई दहावीच्या बोर्ड परीक्षेत अनुभूती निवासी स्कूलचा निकाल १०० टक्के ; आदित्य सिंग प्रथम

सीआयएससीई बोर्ड दहावीच्या परीक्षेत अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश जळगाव | दि.०६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता १० वी आयसीएसईचा निकाल जाहिर झाला असुन यात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यावर्षीही १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. अनुभूती स्कूलमधून आदित्य सिंग हा ९५.४० टक्के गुणांसह प्रथम आला. त्याला गणित या…

Read More

UPSC परीक्षेत आदित्य श्रीवास्तव देशात प्रथम ; पंतप्रधान मोदींनी केले गुणवंतांचे अभिनंदन

नवी दिल्ली | दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज )– केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) चा अंतिम निकाल आज जाहीर झाला आहे. देशातील प्रशासकीय, पोलिस आणि परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांसह अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय सेवेसाठी होणाऱ्या या कठीण परिक्षेत लखनऊ येथील रहिवासी आदित्य श्रीवास्तव हा देशात प्रथम आला आहे. आदित्य श्रीवास्तवने ऑक्टोबर २०१७ पासून नागरी परीक्षेची तयारी सुरू केली….

Read More

आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशाकरीता ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रकियेला सुरवात

जळगाव | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – शिक्षण हक्क अधिनियमानुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची प्रक्रिया प्राथमिक शिक्षण विभागाने सुरू केली आहे. दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील बालकांच्या शैक्षणिक वर्ष २०२४- २५ मधील प्रवेशासाठी पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून (ता.१६) सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. दरवर्षी प्रमाणे…

Read More

कर सहायकपदी नियुक्त झालेल्या पाचोर्‍याच्या लेकीचे यश कौतुकास्पद : वैशालीताई सुर्यवंशी

शिवसेना-उबाठा गटाच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत गरीमा पाटीलचा हृद्य सत्कार पाचोरा | दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मोठ्या जिद्दीने अभ्यास करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारख्या कठीण परिक्षेत यश संपादन करत कर सहायकपदी नियुक्ती मिळवण्याचे गरीमा पाटील यांचे यश अतिशय कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी काढले. त्या गरीमा पाटीलच्या…

Read More
error: Content is protected !!