Headlines
Home » महाराष्ट्र » मुंबईत तीन बड्या नेत्यांची गुप्त बैठक ; मराठवाड्यात मोठा राजकीय भूकंप होणार ?

मुंबईत तीन बड्या नेत्यांची गुप्त बैठक ; मराठवाड्यात मोठा राजकीय भूकंप होणार ?

BREAKING : शिवसेनेचा एक खासदार वाढणार का ? असा प्रश्न अब्दुल सत्तार यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “याचं उत्तर एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे, आपण त्यांना विचारा,” अशी सूचक प्रतिक्रिया दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मराठवाड्यातील तीन बड्या नेत्यांची आज बंद दाराआड चर्चा झाली आहे. या गुप्त बैठकीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे या नेत्यांना बैठक झाल्याचे मान्य करावे लागले. मात्र या भेटीत नेमकं काय घडलं, कोणती राजकीय खिचडी शिजली याबाबत मात्र राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

सविस्तर वृत्त असे की, हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि हिंगोलीचे ठाकरे गटाचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील यांच्यात गुप्त बैठक झाली आहे. या बैठकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही बैठक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुंबईतील निवासस्थानी झाल्याची माहिती समोर येत आहे.

मंत्री अब्दुल सत्तार माध्यमांना प्रतिक्रिया देतांना म्हणाले की, “आपण माझं ऐका. मी हिंगोली जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. ते हिंगोली जिल्ह्याचे खासदार आहेत. माझ्या बंगल्यावर आले, मला भेटायला आले. मंत्रालयात मला भेटायला आले. अशा पद्धतीत कुठेही राजकारण नाही. माझ्या माहितीप्रमाणे ते माझ्याकडे फक्त जिल्ह्याच्या कामासाठी आले होते. आमदार संतोष बांगर हे सुद्धा होते. मी दोघांची चर्चा केली. या चर्चेत कोणतंही राजकारण नाही”, असा खुलासा अब्दुल सत्तार यांनी केला आहे.

शिवसेनेचा एक खासदार वाढणार असल्याची चर्चा आहे. याबाबत काय सांगाल? असा प्रश्न अब्दुल सत्तार यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “याचं उत्तर एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे, असं म्हटलं. एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत. आपण त्यांना विचारुन घ्या. त्यांना जे जे सोबत आहेत त्यांना सोबत घेतात. आमच्या सारखा कार्यकर्ता त्यांच्यासोबत जोडण्याचं काम करतो”, अशी सूचक प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली.

दरम्यान ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकरण यांनी या बैठकीवर प्रतिक्रिया दिली. “मी लोकप्रतिनिधी आहे. मला लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांना भेटावे लागणारच आहे. मला न्याय मंदिरात यावच लागेल. कुणीतरी या छोट्या गोष्टीची चर्चा सुरु केली आहे. तसेच खोडासळपणे लपूनछपून फोटो काढलेला आहे. कुठल्यातरी एका कॉर्नरमधून फोटो काढण्यात आलेला आहे. मोदी आमच्या विरोधात आहेत तर मी त्या सभागृहात जायचंच नाही का?”, असा सवाल नागेश पाटील यांनी केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!