Headlines

‘जो कोणी जातीबद्दल बोलेल, मी त्याला जोरदार लाथ मारेन’ : नितीन गडकरी

नागपूर (वास्तव पोस्ट ) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीच्या राजकारणाविरुद्ध मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, जात, धर्म, भाषा किंवा लिंगाच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीशी भेदभाव केला जाऊ नये. शनिवारी नागपूर येथील सेंट्रल इंडिया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये आयोजित दीक्षांत समारंभात भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने भाषण केले. यावेळी तो म्हणाला, “जो कोणी जातीबद्दल…

Read More

विकसित भारत तसेच माय भारत पोर्टल रजिस्ट्रेशन विषयी चर्चासत्र संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विकसित भारत युथ पार्लमेंट स्पर्धेबद्दल चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रा. डॉ. सचिन नांद्रे तसेच विभागीय संचालक प्रा.डॉ….

Read More

जैन इरिगेशनला द टाईम्स क्रिकेट शिल्ड ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे विजेतेपद

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या ‘ब’ संघांने ‘सी’ डिव्हिजनचा विजयी संघ (डावीकडून) घनश्याम चौधरी, वरूण देशपांडे, अनंत तांबवेकर व मुख्य प्रशिक्षक समद फल्ला जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या ‘ब’ संघाने रिलायन्स ग्रृप स्पोर्टस क्लबच्या संघावर तीन विकेट ने विजय प्राप्त करून  प्रतिष्ठित अशा द टाईम्स क्रिकेट शिल्ड ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे दिमाखात…

Read More

हतनुर कालवा फुटी बाबत तापी पाटबंधारे महामंडळासमोर सामाजिक न्यायार्थ आमरण उपोषण !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव पाटबंधारे विभाग अंतर्गत हतनूर धरणापासून यावल रावेर तसेच चोपडा तालुक्यात गेलेले हतनूर वर पाट फुटी बाबत व इतर काही कारणास्तव चौकशी व कार्यवाही होण्यासाठी केलेल्या तक्रार अर्जा च्या मुद्द्यांसंबंधी समाधान न झाल्याने नशिराबाद येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते नितिन रंधे हे सोमवार दि.१७ रोजी तापी पाटबंधारे महामंडळ…

Read More

बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा होणार विस्तार !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘पीएम गतिशक्ती’ अंतर्गत ‘नेटवर्क प्लॅनिंग गटा’च्या ‘८९व्या’ बैठकीत राज्यातील बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार व कार्यक्षमता सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला. ३२.४६० किमी लांबीच्या या ब्राउनफिल्ड प्रकल्पामुळे मुंबई-पुणे-सोलापूर-वाडी-चेन्नई मार्गावरील वाढत्या प्रवासी आणि माल वाहतुकीमुळे होणाऱ्या विलंबावर उपाय तसेच बदलापूर, वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी…

Read More

आशिष विशाळ हा आपलाच सहकारी : आमदार सुरेश धस

बीड ( वास्तव पोस्ट ) : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आक्रोश मोर्चे काढण्यात आले होते. यावेळी आशिष विशाळ हे नाव चर्चेत आले होते. या व्यक्तीने संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना मदत करायची असल्याचे सांगून अनेक अधिकाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला होता. त्यामुळे मराठा कार्यकर्त्यांनी त्याला बेदम चोप…

Read More

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन १७ मार्च रोजी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन येत्या १७ मार्च रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी रफिक हुरमत रुबाब तडवी यांनी दिली आहे. समस्याग्रस्त व पिडीत महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा. या दृष्टीने महिलांच्या…

Read More

अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आदर्शवत आणि प्रेरणादायी : डॉ.नरसिंह परदेशी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी परकीय आक्रमकांशी संघर्ष करून स्वराज्य उभे केले. स्वराज्य उभारणी आणि विस्तारात आपल्या प्रभावशाली नेतृत्त्वाने योगदान देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आदर्शवत आणि प्रेरणादायी असल्याचे मत डॉ. नरसिंह परदेशी यांनी व्यक्त केले. सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ  यांच्या संयुक्त विद्यमाने मूळजी…

Read More

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी १५ मार्च पर्यंत मुदतवाढ

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : १० वी १२ वी तसेच त्यानंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये जळगाव शहरातील महाविद्यालया मध्ये प्रवेशित असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास, निर्वाह भत्ता तसेच शैक्षणिक भत्ता इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आलेली आहे. ही…

Read More

राज्यातील प्रमुख औद्योगिक शहरांमध्ये नाशिक शहर महत्त्वाचे : विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

नाशिक ( वास्तव पोस्ट ) : नाशिक शहरात ९० च्या दशकानंतर  मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झाले आहे. राज्यातील प्रमुख औद्योगिक शहरांमध्ये नाशिक शहर महत्त्वाचे ठरले असून नाशिकच्या विकासात उद्योगांचे योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले. राज्याच्या उद्योग संचालनालयातर्फे हॉटेल द गेट वे येथील आयोजित इन्व्हस्टमेंट समीट नाशिक २०२५ मध्ये डॉ….

Read More

शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग २ जमिनींवर कर्ज मिळण्यासंबंधीचे परिपत्रक पुन्हा निर्गमित करणार

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : शेतकऱ्यांना विविध कामांसाठी देण्यात येणाऱ्या कर्जावर तारण म्हणून भोगावटा वर्ग दोनमधील जमीनी बँका, वित्तीय संस्थांकडे तारण ठेवण्यासंदर्भातील परिपत्रक यापूर्वीच निर्गमित करण्यात आले आहे. यासंबंधी वित्तीय संस्थांना माहिती व्हावी व शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास सुलभता यावी यासाठी हे परिपत्रक पुन्हा निर्गमित करण्यात येणार आहे. तसेच याची माहिती सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना द्यावी,…

Read More

‘आयएमआर’ इन्स्टिट्यूट मध्ये युवती सभेचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमध्ये ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून युवती सभेचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी, विद्यार्थांनी आपले आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे, त्यांनी स्व:ताची काळजी घेतली पाहिजे हे उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुमन लोढा यांना बोलविण्यात आले. त्याचे…

Read More

प्रा. मनोज मोरे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : नुतन मराठा डी.एड. कॉलेजचे प्रा. मनोज भाऊराव मोरे यांचे आज दि.११ रोजी मध्य रात्री १२.१५ वाजता हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. ते आपल्या कुटुंबासह आनंद मंगल सोसायटी, पिंप्राळा, जळगाव येथे वास्तव्यास होते. आज दुपारी २:१५ च्या सुमारास पिंप्राळा स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रा. मनोज मोरे हे…

Read More

३१ महिला बचत गटांनी १०० टक्के करवसुली दिल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

धरणगाव ( वास्तव पोस्ट ) : महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. स्त्रियांनी केवळ घरापुरत्या न राहता उद्योग, समाजसेवा आणि प्रशासनातही मोठी झेप घ्यावी.” स्वच्छ भारत अभियान, जल जीवन मिशन यांसारख्या योजनांमध्ये महिलांनी पुढाकार घेतला आहे. महिलांच्या प्रगतीशिवाय समाजाची प्रगती शक्य नाही, त्यामुळे महिलांनी स्वावलंबी बनावे! ओला आणि सुका कचरा वेगळा केल्यास त्याचा पुनर्वापर होऊन…

Read More

धुळे येथे जमनाबेन लोकसेवक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात

प्रदीप शर्मा यांना पुरस्कार प्रदान करताना उदय महाजन, नरेश यादव, विजय तांबे, डॉ. सुगन बरंठ, रमेश दाणे धुळे ( वास्तव पोस्ट ) : मानवासाठी गायीचे दूध, शेण अत्यंत उपयुक्त ठरले आहे. गोसेवेचा घराघरात संस्कार रुजणे ही काळाची गरज आहे. ‘घरटी एक गाय!’ हेच तत्त्व अंगीकारलं पाहिजे. गोपालन हा संस्कार आहेच शिवाय सर्व बाजूंनी विचार केल्यास…

Read More
Top
error: Content is protected !!