गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाडांना ११ दिवसांची पोलिस कोठड़ी

ठाणे दि.३ ( प्रतिनिधी )– उल्हासनगर हिललाईन पोलिस स्टेशनमध्ये काल झालेल्या गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाड यांना आज उल्हासनगर कोर्टात हजर केले .व्हीसी द्वारे आरोपींना हजर करण्याची विनंती होती, मात्र कोर्टाकडून ही विनंती फेटाळण्यात आली . उल्हासनगर कोर्टाने गणपत गायकवाडांना ११ दिवसांची पोलिस कोठड़ी सुनावली . काही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून कोर्ट परिसरात पोलिसांचा तगड़ा बंदोबस्त…

Read More

अडवाणी यांना भारतरत्न जाहीर ; माझे जीवन माझ्यासाठी नाही तर देशासाठी समर्पित आहे.

दिल्ली दि .३ ( प्रतिनिधी ) – अयोध्येतील राम मंदिर आंदोलनातील सर्वात मोठा चेहरा लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली . ९६ वर्षीय अडवाणी यांनी स्वतः या संदर्भात एक निवेदन जारी केले . लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “आज मला प्रदान करण्यात आलेला ‘भारतरत्न’ मी…

Read More

विशाखापट्टणम कसोटीत दुसऱ्या दिवशी “जैस्वाल” द्विशतक झळकवण्यात “यशस्वी”

विशाखापट्टणम दि. ३ ( प्रतिनिधी ) इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दूसऱ्या दिवशी भारताने कालच्या ३३६/६ वरुन आपला डाव सुरु केला . त्यात आज सकाळी ६० धावांची भर घालून भारताचा पहीला डाव सर्वबाद ३९६ धावांवर आटोपला .आजच्या खेळाचे वैशिष्ट्य म्हणजे यशस्वी जैस्वालचे द्विशक भारताच्या या धड़ाकेबाज युवा फलंदाजाने कालच्या नाबाद १७९ वरुन आज…

Read More

कृषी क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी AI चा वापर

दिल्ली दि. ३ ( प्रतिनिधी )भारतातील कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील विविध आव्हाने सोडवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI ,आर्टिफिशियल इंटेलिजेंस ) पद्धती वापरल्या आहेत. त्यात प्रामुख्याने ‘किसान ई-मित्र’ हा एआय-संचालित चॅटबॉट आहे जो शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या प्रश्नांसाठी मदत करतो. एकापेक्षा अनेक भाषांना हा चॅटबॉट समर्थपणे मदत करतो . AI…

Read More

वा.रा.सोनार ग्रंथ दालनात मतदार जागृती, ग्रंथ विक्री आणि निवडणूक विषयक प्रदर्शन दालनाचं उद्धाटन

अमळनेर दि. २ ( प्रतिनिधी )– अमळनेर इथं सुरु असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वा.रा.सोनार ग्रंथ दालनात उभारलेल्या, मतदार जागृती, ग्रंथ विक्री आणि निवडणूक विषयक प्रदर्शन दालनाचं आज सकाळी वैशाली बोरसे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, सावखेडा, अमळनेर यांच्या हस्ते उद्घाटन झालं.राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, तसंच संमेलनात कार्यालयाच्या वतीनं आयोजीत ‘तृतीयपंथी समुदायाचे…

Read More

इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वालचे दमदार शतक ; नाबाद १७९ धावा फटकावल्या

विशाखापट्टणम दि .२ ( प्रतिनिधी ) – इंग्लंड विरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील आज दि .२ रोजी दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या नाबाद १७९* धावांच्या जोरावर ६ गड़ी बाद ३३६ धावांपर्यंत मजल मारली . जैस्वाल ने आपल्या कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. शुक्रवारी विशाखापट्टणम येथील वायएस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर भारतीय संघाने…

Read More

६ वी खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे वाल्मिक पाटील (हटकर) मनिषा हटकर व सोनल हटकर यांची बास्केटबॉल खेळाच्या पंच व तांत्रिक अधिकारी पदी निवड 

जळगाव दि.२ ( प्रतिनिधी )- ६ वी खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा २०२३ चे आयोजन दि. २१ ते २६ जानेवारी २४ दरम्यान कोईमतूर तामिळनाडू  झाले होते. बास्केटबॉल या खेळाच्या स्पर्धेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे बास्केटबॉल प्रशिक्षक वाल्मिक पाटील (हटकर) सहप्रशिक्षक व धनदाई माता महाविद्यालयाची विद्यार्थीनी मनिषा हटकर व मुळजी जेठा महाविद्यालयाची विद्यार्थिनी व जैन स्पोर्ट्स अकॅडमीची खेळाडू सोनल…

Read More

कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे महाराष्ट्रातून चॅम्पियन

दुर्गेश्वरी योगेश धोंगडे हिचा सन्मान करताना (डावीकडून) अरूण केदार, यतिन ठाकूर, संदिप दिवे, केतन चिखले व मान्यवर जळगाव दि.०२ ( प्रतिनिधी )- मुंबई-दादर येथे ५७ वी सब ज्युनिअर महाराष्ट्र कॅरम स्टेट चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. २८ ते २९ जानेवारी दरम्यान झालेल्या या स्पर्धेत जळगावची दुर्गेश्वरी योगेश धोंगडे महाराष्ट्रातून चॅम्पियन ठरली. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे दुर्गेश्वरी…

Read More

अमळनेर तालुका क्रीडा संकुल उर्वरित बांधकामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधकाम मजूरांशी आस्थेवाईकपणे संवाद साधला. जळगाव,दि.२ ( प्रतिनिधी) – अमळनेर येथील तालुका क्रीडा संकुल उर्वरित बांधकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज झाले. याप्रसंगी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,…

Read More

मुख्यमंत्र्यांनी दिले ग्रामरोजगार सेवकांचे गटविमा काढण्याचे निर्देश

राज्यातील ग्रामरोजगार सेवकांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली मुंबई दि. २ ( प्रतिनिधी )– ग्रामपंचायतस्तरावर काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांच्या विविध मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असून ग्रामरोजगार सेवकांचा गटविमा काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले. ग्रामरोजगार सेवकांच्या पदनामात बदल करुन ते ग्रामरोजगार सहायक करण्यात येईल, असे जाहीर करतानाच मानधनात…

Read More

सर्वसामान्यांना न्याय देणारा, आत्मनिर्भर व बलशाली भारताचा पाया घालणारा अर्थसंकल्प ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदें

मुंबई दि. २ (प्रतिनिधी )– आत्मनिर्भर व बलशाली भारताचा पाया घालणारा आणि विकसनशील भारत ते विकसित भारत अशी वाटचाल करणारा अर्थसंकल्प आहे. हा केंद्रीय अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मागील १० वर्षांच्या प्रयत्नांचे फलित असून देशाला महासत्ता बनवण्याच्या आणि देशाला ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याच्या त्यांच्या लक्ष्याकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प आहे. सर्वसमावेशक, सर्वसामान्यांना न्याय देणारा,…

Read More

समता परिषद व ओबीसी बांधवांतर्फे कुणबी प्रमाणपत्राबाबत तहसिलदारांना निवेदन सादर

कजगाव दि.२ ( प्रतिनिधी )–महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला मराठा आरक्षणाअंतर्गत सगेसोयरे या धरतीवर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे अध्यादेशानुसार आश्वासित केले आहे. यामुळे ओबीसीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपला हा निर्णय मूळ ओबीसींवर अन्याय करणारा आहे ,अशा व विविध हरकतीचें निवेदन गुरुवारी आमदार किशोर पाटील व भडगाव तहसीलदार मुकेश हिवाळे यांना भडगाव तालुका समता…

Read More

साहित्य संमेलना ठिकाणी साने गुरुजींच्या हस्ताक्षरातील छात्रालय दैनिकाचे आकर्षण

अमळनेर दि.१ ( प्रतिनिधी ) पूज्य साने गुरुजींनी १०० वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेले हस्ताक्षरातील ‘छात्रालय दैनिक’ साहित्य संमेलनाच्या ठिकाणी आकर्षण ठरले आहे. विशेष म्हणजे साने गुरुजींनी स्वतःच्या हस्ताक्षरात त्यावेळी लिहिलेले दैनिक आजही पाहायला मिळत आहे.जुलै १९२३ मध्ये पूज्य साने गुरुजी तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी अमळनेरमध्ये आले. महाविद्यालयात शिकत असताना त्यांच्यातील कलागुण आणि कौशल्य पाहून श्रीमंत प्रताप…

Read More

१०० हात करताहेत साहित्य नगरीची स्वच्छता

अमळनेर दि.१ ( प्रतिनिधी ) – उद्या २ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या साने गुरुजी साहित्य नगरीत संमेलन परिसराच्या स्वच्छतेचे काम गेल्या १५ दिवसांपासून सुरू असल्याची माहिती अमळनेर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचे सुपरवायझर हैबतराव पाटील यांनी दिली.साहित्य संमेलन प्रताप महाविद्यालयात होत आहे. त्यानुसार मुख्य सभामंडपासह पूर्ण परिसर झाडणे, कचरा उचलून तो ६ घंटागाड्यात टाकून तो निर्धारीत कचरा…

Read More

अमळनेरात आजपासून सारस्वतांची मांदियाळी

अ.भा. मराठी साहित्य संमेलनासाठी साहित्यिकांसह रसिक दाखल अमळनेर दि. १ ( प्रतिनिधी ) – अखिल भारतीय मराठी महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २ फेब्रुवारीपासून साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेरात सुरू होत आहे. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राज्यभरातील अनेक साहित्यिकांसह रसिक अमळनेरात दाखल झाले आहेत. साहित्य संमेलनामुळे सर्वत्र प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. १९५२…

Read More
error: Content is protected !!