जळगाव | दि.१९ (वास्तव पोस्ट न्यूज)– न्यू जागृती मित्र मंडळ संचलित जिजामाता माध्यमिक विद्यालय, हरी विठ्ठल नगर येथे जल सप्ताह निमित्त जिल्हा विधीसेवा प्राधिकरणातर्फे व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळेस विधीतज्ञ अँड. ऐश्वर्या मंत्री, विधीतज्ञ भारतीताई कुमावत यांचे शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र आर. खोरखेडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नंतर ऐश्वर्या मंत्री यांनी पाण्याचे महत्व स्पष्ट केले.तसेच विधीतज्ञ भारतीताई कुमावत यांनी वृक्ष संवर्धन व पाणी यांचा परस्पर संबंध निसर्ग रक्षणासाठी व जागतिक तापमानासाठी खूप मोलाचा असतो असे या यावेळी स्पष्ट केले.
याप्रसंगी शिक्षक व किशोर पाटील, संजय खैरनार, आशा पाटील, संगीता पाटील, संजय पाटील, प्रशांत मडके, जगदीश शिंपी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा पाटील तर आभार प्रदर्शन संजय खैरनार यांनी केले.
