Home » जळगाव » वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ; सौर कृषिपंप उखडले

वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ; सौर कृषिपंप उखडले

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भडगाव तालुक्यातील शिंदी पेडगाव या गावांसह आजुबाजूच्या परिसरात सायंकाळच्या सुमारास झालेल्या जोरदार पाऊस आणि चक्रिवादळामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसुन आले. तसेच पेडगाव शिवारातील शेतकरी योगेश चैत्राम पाटील व संजय चुडाम पाटील

यांच्या शेतातील विहीर लगत असलेला सौर कृषीपंप संच पाऊस आणि जोरदार वादळी वाऱ्यामुळे जमिनीतून पूर्णपणे उखडून उध्वस्त होऊन या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच अन्य शेतकऱ्यांनाही या वादळी पावसामुळे नुकसान सोसावे लागले आहे.

तरी शासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन वस्तुस्थितीची पहाणी करून झालेल्या नुकसानापोटी शासनाने शेतकरी वर्गास तातडीने मदत जाहिर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातुन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!