दिल्ली मोर्चा : आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या .
दिल्ली, दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – देशातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी दिल्लीकडे कूच केली आहे. केंद्र सरकारकडे आपल्या मागण्या मांडण्यासाठी आजपासून ‘दिल्ली चलो’ मोर्चा सुरू केला आहे. पिकाच्या किमान भावाची मागणी करणाऱ्या हजारो आंदोलक शेतकऱ्यांना दिल्लीवर मोर्चा काढण्यापासून रोखण्यासाठी उत्तर भारतातील पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. विरोध रोखण्यासाठी राजधानीला रेझर वायर, सिमेंट…
