TCS partners with BSNL : टीसीएस आणि बीएसएनएल यांच्यात १५ हजार कोटी रूपयांचा करार झाला आहे. दोन कंपन्या मिळून भारतातील १०००गावांमध्ये 4G इंटरनेट सेवा सुरू करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे येत्या काळात बीएसएनल ग्राहकांना हायस्पीड इंटरनेट सेवा मिळणार आहे.
नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भारतात आजच्या इंटरनेटच्या युगात सर्वात स्वस्त आणि मस्त सर्विस पाहीजे असलेला मोठा वर्ग आहे. अलीकडेच खाजगी दूरसंचार कंपन्या Airtel आणि Jio ने त्यांचे रिचार्ज प्लॅन वाढवले आहेत. त्यानंतर इंटरनेट वापारकर्ते मोठ्या प्रमाणावर BSNL कडे वळू लागले आहेत. एवढेच नाही तर Airtel आणि Jio वापरकर्ते त्यांचे मोबाईल नंबर BSNL वर पोर्ट करत आहेत. सोशल मीडियावरही यासंदर्भात अनेक ट्रेंड सुरू आहेत.
दरम्यान टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि BSNL यांच्यात १५ हजार कोटी रुपयांचा करार झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. TCS आणि BSNL मिळून भारतातील सध्या १००० गावांमध्ये 4G इंटरनेट सेवा सुरू करणार आहेत. त्यामुळे येत्या काळात लोकांना स्वस्तात हायस्पीड इंटरनेट सेवा मिळणार का याचे कुतूहल लागुन आहे.
आज 4G इंटरनेट सेवेवर जिओ आणि एअरटेलचे वर्चस्व आहे, त्यांचे ग्राहक मोठ्या संख्येने वाढले आहेत. परंतु जर बीएसएनएल मजबूत झाले तर ते जिओ आणि एअरटेलच्या अडचणी वाढवू शकतात. टाटा भारतातील सुमारे चार क्षेत्रांमध्ये डेटा केंद्रे उभारत असल्यामुळे भारतातील 4G इंटरनेट पायाभूत सुविधा मजबूत करण्यात नक्कीच मदत होईल. BSNL ने देशभरात ९००० पेक्षा जास्त 4G नेटवर्क स्थापित केले असुन ते आता तब्बल एक लाखापर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे.
📲 जिओ,एअरटेल,व्हीआयच्या रिचार्ज दरात वाढ :
दरम्यान जून महिन्यात जिओने आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये भरघोस वाढ करण्याची घोषणा केली होती. यानंतर Airtel आणि Vi ने देखील त्यांच्या प्लॅनमध्ये वाढ करण्याची घोषणा केली. जिओ आणि एअरटेलच्या वाढलेल्या किमती ३ जुलैपासून लागू झाल्या, तर Vi च्या वाढलेल्या किमती ४जुलैपासून लागू झाल्या. जिओने सर्वाधिक किंमती वाढवल्या. या कंपन्यांनी एकाच वेळी रिचार्च किंमतीत अचानक ११ ते २५ टक्के वाढ केल्याने जिओ, एयरटेल आणि व्हीआय च्या ग्राहकांचा संताप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. परिणामी त्यामुळे इंटरनेट ग्राहक आता बीएसएनएलकडे वळू लागले आहेत. टाटा-बीएसएनएल यांच्यातल्या करारामुळे येत्या काही दिवसांत टेलिकॉम उद्योगात कायकाय बदल होतात हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
