गावांमध्ये शुद्ध पाण्यासाठी तातडीने उपाययोजना करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश
जळगांव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्ह्यातील १७१ गावांतील २०५ जलस्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले असून, त्यामुळे ग्रामस्थांनां शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी तातडीने दखल घेत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती जाणून घेवून त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही भूजल विभागाने…
