Headlines

अनुभूती स्कूलमध्ये ६ रोजी दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अनुभूती निवासी शाळेत दोन दिवसीय भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी शाळेच्या असेंब्ली हॉलमध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, यावेळी शाळेचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन आणि प्राचार्य देबासिस दास उपस्थित राहणार…

Read More

म्हसावद येथे भव्य अमरनाथ गुहा दर्शन ; १२ ज्योतिर्लिंग दर्शन व गीता प्रदर्शनी

म्हसावद ( वास्तव पोस्ट ) : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने म्हसावद पुण्यनगरीत ९० व्या त्रिमूर्ती शिव जयंतीनिमित्त प्रथमच भव्य, दिव्य व ऐतिहासिक स्वरूपाचा आध्यात्मिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाअंतर्गत अमरनाथ गुहा दर्शन, १२ ज्योतिर्लिंग दर्शन तसेच श्रीमद्भगवद्गीता प्रदर्शनीचे भव्य आयोजन मंगळवार, दि. १० फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. शिवरात्री महोत्सव कार्यक्रम…

Read More

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या जळगाव तालुकाध्यक्षपदी सुमित पाटील

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथे पद्मालय विश्रामगृहात नुकत्याच पार पडलेल्या गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत उत्तर महाराष्ट्र, जिल्हा व तालुकास्तरावरील नूतन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. या बैठकीत जळगाव तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी वावडदा (ता. जळगाव) येथील रहिवासी, ज्येष्ठ पत्रकार, गौरी उद्योग समूहाचे चेअरमन तसेच सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात भरीव कार्य…

Read More

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष : अशोक जैन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : देशाला सात टक्के कृषी विकास दर गाठायचा असेल, तर कृषी क्षेत्राची भूमिका निर्णायक ठरणार आहे. याची जाणीव ठेवत अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. भारत विस्तार AI एग्री टूलची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची उपलब्धता आणि हाय व्हॅल्यू क्रॉप शेतीला प्रोत्साहन देण्याच्या घोषणा भविष्यातील शेतीसाठी दिशादर्शक…

Read More

अमोल मिटकरींचे धक्कादायक प्रश्न : विमान अपघातात ६ मृत्यू ! मग सहावी व्यक्ती कुठे ?

बारामती ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्य हादरले असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्षात फक्त ५ मृतदेह सापडल्याचा मुद्दा उपस्थित करत मिटकरींनी या घटनेच्या…

Read More

मनोज वाघ – दिलदार मनाचा माणूस, समाजघडणीचा दीपस्तंभ

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मनोज वाघ हे नाव उच्चारताच डोळ्यांसमोर उभा राहतो तो एक हसतमुख, सकारात्मक आणि सतत कार्यरत असलेला व्यक्तिमत्त्वाचा झरा. क्रीडा क्षेत्रात सक्रिय असतानाच विधी तज्ञ म्हणून त्यांनी समाजाच्या, विशेषतः विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश निर्माण केला आहे. त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू केवळ यश किंवा प्रसिद्धी नसून माणूस घडवणे हा आहे. क्रीडा क्षेत्रात…

Read More

सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ; राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या विधिमंडळ गटाने आज दुपारी २ वाजता बैठक घेऊन सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेते म्हणून निवड केली. त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता मुंबईतील लोक भवनात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, यावेळी हॉलमध्ये “अजित दादा अमर रहें”…

Read More

शांत संयमाचा विजय — प्रविण निकम यांची संघर्षगाथा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शांत, संयमी, कायम हसतमुख आणि पहिल्याच भेटीत मन जिंकणारा चेहरा प्रविण निकम. पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे लपलेली आहे गरिबीची जळजळीत झळ, कष्टांची राख, आणि स्वप्नांवर अढळ विश्वास असलेली संघर्षगाथा. गरिबी म्हणजे केवळ पैशांची कमतरता नाही, तर ती माणसाची परीक्षा असते. प्रविणने ती परीक्षा कधीच चुकवली नाही.ज्या दिवसांत इतर जण…

Read More

जनसेवा विचारधारा फाऊंडेशन तर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने सामाजिक, शैक्षणिक, सहकार, राजकीय क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. राज्यातील जनता ही आपले प्रश्न अडीअडचणी, तक्रारी (समस्या) घेऊन त्यांच्या दरबारी जात होते व जनतेची कामे मार्गी लावेपर्यंत त्या समस्येचा पाठपुरावा उपमुख्यमंत्री अजित…

Read More

जीवाचे रान करणारा माणूस हरवला : अशोक जैन

अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाची वार्ता अत्यंत दु:खद, वेदनादायी आहे. नेहमी प्रसन्न, स्वागतशील व्यक्तिमत्त्व म्हणजे अजितदादा! स्वत:ची एक खास शैली विकसित केलेलं कर्तबगार नेतृत्व. शिस्तबद्ध, वेळेचे नियोजन काटेकोर, दिलेला शब्द कोणत्याही परिस्थितीत पाळण्याची बांधिलकी म्हणजे अजितदादा! राजकीय क्षेत्रात काम करत असताना स्पष्टवक्तेपणा अडचणी निर्माण करतो परंतु दादा धैर्यशील आणि कणखर होते. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी जीवाचं…

Read More

ममता बॅनर्जी यांचा खळबळजनक दावा : अपघात नसून त्यामागे काही कट असण्याची शक्यता !

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्रचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज दि. २८ रोजी सकाळी बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातून मोठी शोककळा पसरली आहे. मात्र, ही घटना केवळ अपघात नसून त्यामागे काही कट असण्याची शक्यता वर्तवली असून राजकीय नेत्यांनी…

Read More

प्रामाणिक कर्तव्यनिष्ठेचा आदर्श : जिल्हाधिकारी वाहनचालक सचिन मोहिते

शासन यंत्रणेच्या यशस्वी कार्यामागे केवळ निर्णय घेणारे अधिकारीच नव्हे, तर त्या निर्णयांची अंमलबजावणी सुरळीत होण्यासाठी अहोरात्र योगदान देणारे कर्मचारीही तितकेच महत्त्वाचे असतात. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले वाहनचालक सचिन मोहिते हे अशाच निःस्वार्थ, प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ सेवकांचे उत्तम उदाहरण आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनचालक म्हणून जबाबदारी पार पाडताना वेळेचे काटेकोर पालन, वाहनाची स्वच्छता व सुरक्षितता, प्रवासादरम्यान संयमित…

Read More

धक्कादायक : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू

बारामती ( वास्तव पोस्ट ) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी मुंबईहून बारामतीला जात असताना झालेल्या विमान अपघातात निधन झाले. या अपघातात वैमानिक आणि पवार यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसह इतर चार जणांचाही मृत्यू झाला आहे. आज सकाळी ८ वाजता मुंबईहून उड्डाण करणारे हे छोटे विमान ४५ मिनिटांनी लँडिंगच्या प्रयत्नात बारामती…

Read More

पिडीत, शोषित, वंचित महिलांच्या न्यायासाठी उभी राहिलेली अभिव्यक्त स्वातंत्र्याची मशाल — भारती कुमावत

भारती ज्ञानेश्वर कुमावत (विधी तज्ञ कौन्सिलरतथा जेष्ठ समाजसेविका ) समाजाच्या तळागाळात आजही अनेक पिडीत, शोषित व वंचित महिला आपल्या वेदना मनातच दडवून जगत आहेत. अन्याय सहन करताना त्यांचा आवाज दडपला जातो, हक्क हिरावले जातात आणि संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार केवळ कागदापुरते उरतात. अशा अंधारलेल्या आयुष्यात न्यायाची, हक्कांची आणि अभिव्यक्त स्वातंत्र्याची मशाल पेटवणारे नाव म्हणजे —…

Read More

आधुनिक कृषी तंत्रज्ञान नव्या भारताच्या विकासाचा मार्ग : मंत्री नारायन सिंह कुशवाह

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कमी श्रमात, कमी जागेत, कमी पाण्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे यासाठी ठिबक, स्प्रिंकलर, ऑटोमेशन, प्रिसीजींग फार्मिंग, अतिसघन फळबागांची लागवड करून प्रक्रिया उद्योगांवर भर दिला पाहिजे. याच्या अवलंबनातूनच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, तसेच ग्रामीण स्तरावर रोजगार वाढेल परिणामी स्थलांतर थांबू शकेल. त्यासाठी तरूणांनी आपल्याकडील ज्ञानाचा उपयोग हा शेतीमध्ये असलेले अत्याधुनिक…

Read More
Top
error: Content is protected !!