Headlines

सलमान खानच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचा इशारा; बिश्नोई गँगला संपवून टाकू

मुंबई | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंट निवासस्थानाबाहेर गोळीबार केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुजरातमधून दोन जणांना अटक केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमानच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर गोळीबाराची घटना घडल्यानंतर परिसरात आणि देशातील चाहत्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, मुंबई…

Read More

श्रीकांत शिंदेंवर संजय राऊतांकडून ५०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप !

मुंबई | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या फाऊंडेशन मध्ये ५०० कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊतांनी केलेल्या या आरोपांनंतर मात्र राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तरात म्हटले की, “संजय राऊत हे मानसिक रुग्ण आहेत. त्यांनी…

Read More

कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीची उद्धव ठाकरे यांच्यासोबत विविध प्रश्नांवर चर्चा

मुंबई | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज )– कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्यच्या शिष्टमंडळाने आज महाविकास आघाडीचे नेते व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राज्यातील संघटित व असंघटित कामगार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबद्दल चर्चा केली. यावेळी समितीच्या वतीने १५ मागण्याचे निवेदन मा. उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. या १५ मागण्याबाबत सहमती असल्याचे सांगून कामगारांच्या,…

Read More

संजय राऊत हे खिचडी घोटाळ्यात मुख्य आरोपी ; संजय निरुपम यांचा गंभीर आरोप

मुंबई | दि.८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम यांनी संजय राऊत हे खिचडी घोटाळा चोरी प्रकरणाचे मास्टर माईंड असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये संजय राऊत यांची पत्नी, मुलगी, भाऊ त्याचबरोबर त्यांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा दावा निरुपम यांनी केला आहे. दरम्यान अमोल कीर्तीकर…

Read More

नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; जात प्रमाणपत्र वैध

मुंबई | दि. ४ (वास्तव पोस्ट न्यूज ) – अमरावतीच्या विद्यमान खासदार आणि लोकसभा २०२४ च्या भाजप उमेदवार नवनीत कौर राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. मुंबई हायकोर्टाने नवनीत राणांच्या जातीचा दाखला बनावट ठरवला होता. मुंबई हायकोर्टाचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात…

Read More

अवकाळी पावसाचा इशारा; विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बरसणार

पुणे | दि.३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार पाच ते आठ तारखेला मध्य महाराष्ट्रात, सहा ते आठ तारखेला कोकण गोवा व मराठवाड्यात आणि सात व आठ तारखेला विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशात हिमालयाच्या पायथ्याचा काही भाग आणि ईशान्य भारत वगळता राजस्थान, दिल्ली तसेच पूर्ण दक्षिण…

Read More

गांधी मैदानात १०,४९५ विद्यार्थ्यांचा मानवी रांगोळी साकारून मतदारांना संदेश; नॅशनल व आशिया पॅसिफिक रेकॉर्डची नोंद

कोल्हापूर | दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -सार्वत्रिक लोकसभा निवडणूक सन २०२४ साठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जनजागृती करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टिने आज विद्यार्थ्यांच्या सहभागातून भव्य मानवी रांगोळी (साखळी) साकारण्यात आली. या नाविन्यपूर्ण उपक्रमाला जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले होते. लोकसभा निवडणूक २०२४…

Read More

‘या’ जिल्ह्यांमध्ये पुन्हा अवकाळी पाऊस व गारपीट ; हवामान विभागाचा इशारा

शेतकऱ्यांची चिंता वाढली… नागपूरला ऑरेंज अलर्ट ! पुणे | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – उन्हाळ्याचा कडाका जाणवू लागला असतांनाच राज्यातील हवामानात बदल झाल्याने काही भागत पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मार्चच्या मध्यात काही जिल्ह्यांचा पारा ३५ ते ४० पर्यंत पोहचले आहे. दुसरीकडे मात्र हवामान खात्याने विदर्भात काही भागात अवकाळीचा इशारा…

Read More

मुंबई महानगराच्या अत्याधुनिक नागरी व्यवस्थापनासाठी “थ्री डी मॅपिंग” करण्याची कार्यवाही सुरू

मुंबई | दि. १५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पूर्व उपनगरे, आश्विनी भिडे यांच्या हस्ते आज वांद्रे कुर्ला संकुल येथे थ्री डी मॅपिंगचा शुभारंभ करण्यात आला. जिओस्पेशिअल तंत्रज्ञानाचा वापर करून हे त्रिमितीय अर्थात थ्री डी मॅपिंग (डिजीटल ट्वीन) केले जाणार आहे. त्यामध्ये मुंबईतील महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागांचे मिळून ५०० चौरस किलोमीटर…

Read More

अनिल परब यांचे दापोली येथील रिसॉर्ट पाडण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश

रत्नागिरी | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज )– अनिल परब यांचे दापोलीमधील साई रिसॉर्ट पडणार हे आता निश्चित झाले आहे. साई रिसॉर्ट अनधिकृत असल्याचे हायकोर्टामधील सुनावणीदरम्यान स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनिल परब आणि सदानंद कदम यांना चार आठवड्यात हा रिसॉर्ट पाडा असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०२० मध्ये या…

Read More

मुंबईतील ८ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यास मंत्रिमंडळाकडून आजच्या बैठकीत ग्रीन सिग्नल

मुंबई | दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईतील ८ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रिटिश कालीन नावं असलेल्या या रेल्वे स्थानकांचे आता नामकरण केले जाणार आहे. मुंबईतील ज्या ८ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यास मान्यता मिळाली आहे त्यात, करी रोड रेल्वे स्थानकाचे नाव लालबाग असं केले जाणार…

Read More

अहमदनगर शहराचे नामांतर; आता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या नावाने ओळखलं जाणार ‘नगर’

मुंबई | दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत अहमदनगर शहराच्या नामांतराबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. अहमदनगर शहराला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी विविध पक्षाच्या नेत्यांकडून तसेच कार्यकर्त्यांकडून केली जात होती. अखेर सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अहमदनगर शहराचं नामांतर…

Read More

जिल्ह्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्पास मंजुरी

मुंबई | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -राज्यातील जिल्ह्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी जागतिक बँक सहाय्यित महाराष्ट्र जिल्हास्तरीय विकासास चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प (Maharashtra Strengthening Institutional Capabilities in Districts for Enabling Growth Project MahaSTRIDE) राबविण्यास तत्वतः मान्यता देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सह्याद्री अतिथीगृह…

Read More

महसूल विभागातील पदनामे सन्मान वाढवणारी करावीत ; महसूल मंत्री विखे पाटील

मुंबई | दि. ११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राज्यातील महसूल विभागातील काही पदांची पदनामे ही ब्रिटिशकालीन असून अशी पदनामे बदलून कर्मचाऱ्यांचा सन्मान वाढवणारी पदनामे करावीत, असे निर्देश महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यांसाठी राज्याचे महसूल मंत्री श्री. विखे पाटील…

Read More

देशात १० नव्या वंदे भारत एक्स्प्रेस धावणार ; महाराष्ट्राला मिळणार दोन हायस्पीड ट्रेन ?

पुणे | दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – देशात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेन महाराष्ट्रातून मुंबई- गांधीनगर दरम्यान सुरु झाली होती. त्यानंतर राज्यातील मुंबई-पुणे-सोलापूर, मुंबईवरुन शिर्डी, मुंबई-गोवा, मुंबई-जालना, नागपूर ते बिलासपूर या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु आहे. देशात आणखी दहा वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होत आहे. त्यातील दोन एक्स्प्रेस महाराष्ट्रातून…

Read More
Top
error: Content is protected !!