Headlines

प्रत्येक तालुक्यात ‘संविधान भवन’ उभारणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

CM EKANATH SHINDE : भारतरत्न डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा आदर व सामाजिक न्यायाची भावना अधिक दृढ व्हावी,यासाठी प्रत्येक तालुक्यात ‘संविधान भवन’ उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपतीसंभाजीनगर येथे आयोजित मुख्यमंत्री कृतज्ञता सोहळ्यामध्ये केली. छत्रपती संभाजी नगर ( वास्तव पोस्ट ) : विविध विकास प्रकल्पांना निधी दिल्याबद्दल आंबेडकरी समाज समितीतर्फे येथील टीव्ही…

Read More

जालना ते जळगाव दरम्यान नवीन रेल्वे लाईन प्रकल्पास मंत्रिमंडळाची मंजुरी

Jalana to Jalgaon Rail Line : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडी विषयक मंत्रिमंडळ समितीने रेल्वे मंत्रालयाच्या आठ प्रकल्पांना मंजूरी दिली आहे. यासाठी एकूण रु. २४६५७ कोटी (अंदाजे) खर्च अपेक्षित आहे. प्रकल्प २०२३-३१ पर्यंत पूर्ण होणार आहे. यात जालना-जळगाव- १७४ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाचा समावेश आहे. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जालना ते जळगाव…

Read More

मराठी चित्रपट सृष्टीतला हास्य तारा निखळला ; जेष्ठ अभिनेते विजय कदम काळाच्या पडद्याआड !

Vijay Kadam Passes Away : मराठी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेते विजय कदम यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले. विजय कदम गेल्या काही काळापासून कॅन्सरशी लढा देत होते. अखेर आज दि.१० रोजी विजय कदम यांची प्राणज्योत मालवली. यामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टी गाजवणारे दिग्गज…

Read More

गणेशोत्सव : मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला वाहतूक नियोजनाचा आढावा ; कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर रस्त्यांविषयीच्या विविध समस्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ठाणे, पालघर, नाशिक, रायगड जिल्ह्यातील महामार्गावरील वाहतूक कोंडी, तसेच आगामी गणेशोत्सव कालावधीतील वाहतुकीच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. ठाणे-नाशिक, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी रॅपिड क्विक हार्डनर, एम सिक्टी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून त्याचे काम प्रगतीपथावर…

Read More

बांगलादेशातील भारतीयांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांची परराष्ट्रमंत्री सोबत चर्चा

CM meet Minister Jaishankar : बांगलादेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसह अभियंते आणि इतरांची त्यांच्या लोकेशनसह माहिती परराष्ट्र मंत्रालयाला देण्यात आली आहे. त्यांना तातडीने मायदेशात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी महत्त्वाची पावले उचलली आहेत. मुंबई ( वास्तव पोस्ट ) : बांगला देशातील सध्याच्या उद्भवलेल्या परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत विविध मुद्द्यांवर चर्चा…

Read More

‘योद्धा कर्मयोगी-एकनाथ संभाजी शिंदे’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण

CM EKNATH SHINDE : पुस्तकाच्या अनावरणावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, खरं तर हे पुस्तक म्हणजे माझ्या आयुष्याचा संपूर्ण पिक्चर नाही, इंटर्व्हल देखील नाही. हा तर फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अभि बाकी है,असे सांगून सदैव कार्यरत राहीन अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी याप्रसंगी दिली. मुंबई ( वास्तव पोस्ट ) : ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन…

Read More

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. ● आज घेण्यात आलेले महत्वपूर्ण निर्णय (थोडक्यात) ◆ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन. महत्वाकांक्षी वैनगंगा-…

Read More

रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते ! माकपा शिष्टमंडळाकडून खड्ड्यात वृक्षारोपण

नाशिक ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पाथर्डी फाटा येथील नरहरी नगर, आनंद नगर, मोरेश्वर नगर, दामोदर नगर, स्वप्नपूर्ती नगर, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल तसेच इतर परिसरामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कमिटी सदस्य कॉ. सिताराम ठोंबरे, सातपूर विभाग प्रमुख कॉ. डि. एन.व्हडगर यांनी भेट दिली. यावेळी पाथर्डी फाटा येथील रस्त्यांची झालेली दुरावस्था बघितली. सर्वच परिसरामध्ये, रस्त्यांवर…

Read More

तृतीयपंथीयांच्या रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावे ; विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

विभागीय दक्षता समितीची आढावा बैठक संपन्न Dr. Pravin Gedam : विभागीय समितीच्या आढावा बैठकीत डॉ. प्रवीण गेडाम म्हणाले की, तृतीयपंथी यांना समाजाच्या विकास प्रवाहात आणण्यासाठी त्यांना आर्थिक सक्षम करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना केंद्र सरकार व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून रोजगाराची, स्वयं रोजगाराची संधी उपलब्ध करून द्याव्यात. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) :…

Read More

राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘अंधश्रध्दा निर्मूलन कक्ष’ स्थापन होणार

Superstition Eradication Cell : राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील पत्र राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांनी सर्व पोलीस स्टेशनला पाठवलं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अनेक मागण्यांपैकी एक प्रमुख मागणी सरकारने मान्य केल्याने समितीने स्वागत केले आहे. जळगाव ( वास्तव पोस्ट…

Read More

राज्यातील शेतकऱ्यांसाठी “मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-२०२४” लागू

आता ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या शेतीपंपाचा वापर करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार Free electricity to agricultural pumps : कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर ३९ हजार २४६ द.ल.यू. आहे. मुख्यतः या विजेचा वापर कृषी क्षेत्रात पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो. आता राज्यातील ७.५ एच.पी. पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषि पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवण्यात आले…

Read More

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी.पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती

Maharashtra New Governor : महाराष्ट्रात येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यातच आता राज्यात नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. भगतसिंह कोश्यारी, रमेश बैस यांच्यानंतर राधाकृष्णन हे गेल्या पाच वर्षांतील महाराष्ट्राचे तिसरे राज्यपाल आहेत. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी विविध राज्यात नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे. यात…

Read More

जुनी पेन्शन : हा विषय राज्य सरकारच्याच अखत्यारीतला ; केंद्रीय सचिवांचे शुभांगी पाटील यांना पत्र

Old Pension Scheme : शिक्षक व कर्मचाऱ्यांना जूनी पेंशन लागू करावी यासाठी शुभांगी पाटील ह्या प्रयत्नशील आहेत. आता त्यांना केंद्रीय सचिवांचे एक पत्र प्राप्त झाले आहे. त्यात जूनी पेंशन योजना देणे ही राज्यशासनाची जबाबदारी असल्याचे नमूद केले असुन याबाबत राज्यशासनाने योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्यातील…

Read More

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील बालिंगा पुलावरून वाहतूक बंद; अत्यावश्यक सेवा मात्र सुरु राहणार

कोल्हापूर ( वास्तव पोस्ट न्यूज ) : कोल्हापूर-बालिंगे-कळे-साळवण ते गगनबावडा या मार्गावरील जुन्या दगडी कमानी पुलाच्या पूराच्या पाण्याची पातळी धोका पातळीपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे बालिंगा पुलावरून वाहतूक आजपासून थांबवण्यात आली आहे. चार चाकी आणि लहान वाहनांना वाहतुकीसाठी हा पूल पूर्णपणे थांबवण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजवरुन जिल्ह्यात पावसाची परिस्थिती लक्षात पाणी-पातळी अधिक वाढण्याची शक्यता आहे….

Read More

बदलापूरात NDRF चे पथक दाखल; उल्हासनदीने ओलांडली धोक्याची पातळी

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : आज सकाळपासून मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईतील सायन-माटुंगा, चुनाभट्टी, कुर्ला येथे पाणी साचल्याने लोकल सेवेवर त्याचा परिणाम झाला आहे. बदलापूरात उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली असुन बदलापूरात NDRF चे पथक दाखल झाले आहे. मुंबई आणि उपनगरात बऱ्याच ठिकाणी काल रात्री पासुनच पुन्हा…

Read More
Top
error: Content is protected !!