जळगाव ( वास्तव पोस्ट ) : स्वामी विवेकानंद ज्यूनिअर कॉलेज मू.जे. महाविद्यालय जळगाव येथे विद्यार्थी कल्याण समिती तर्फे विद्यार्थ्यांच्या शासकीय शिष्यवृत्ती व शासकीय धोरण या विषयावर उद्घाटनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी मार्गदर्शक म्हणून संतोष मनुरे यांनी मार्गदर्शन केले. या व्याख्यानावेळी मनूरे यांनी तळागळातील पात्र विद्यार्थ्यांच्या समस्या व त्यांच्यासाठी शासनाने अवलंबलिले धोरण याचे विस्तृत मार्गदर्शन केले.
खेड्या-पाड्यातील होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक व आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. यावेळेस शासनाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती व वसतीगृहाच्या विविध योजना व त्यासाठी असणारे निकष, पात्रता व लागणारे कागदपत्र याबाबत इत्यंभूत मार्गदर्शन केले गेले. विद्यार्थ्यांसाठी सरकारी योजनेतून शिक्षणाच्या आर्थिक खर्चाची तरतूद असल्याने शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी शासन प्रयत्नशील असते.
या कार्यक्रमावेळी अध्यक्षस्थानी प्रा.आर.बी.ठाकरे, समन्वयक स्वाती बऱ्हाटे, प्रा. उमेश पाटील समिती अध्यक्ष प्रा.डॉ. जयंत इंगळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. दिपक चौधरी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.ज्योती सोनवणे, प्रा. रुपम निळे, प्रा. संदिप गव्हाळे, प्रा. योगेश धनगर, प्रा.कविता भारुडे, प्रा. विनोद पावरा यांनी परिश्रम घेतले.
