जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडला “राज्य निर्यात उत्कृष्टता” सुवर्ण पुरस्कार

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुंबई येथील हॉटेल ताज लँड्स एन्ड्स, बांद्रा येथे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयामार्फत आयोजित “राज्य निर्यात पुरस्कार वितरण सोहळा” भव्यदिव्य स्वरूपात संपन्न झाला. या सोहळ्यात सन २०२२-२३ आणि २०२३-२४ या वर्षांतील उत्कृष्ट निर्यात कामगिरी करणाऱ्या उद्योगांना गौरविण्यात आले. हा पुरस्कार कंपनीच्या उत्कृष्ट निर्यात कार्याची दखल घेऊन माननीय उद्योग मंत्री उदय…

Read More

अनुभूती विद्यानिकेतनमध्ये ‘दिवाळी मेळावा’मध्ये चिमुकल्यांचे उद्योजकीय दर्शन

अनुभूती बाल निकेतन मधील दिवाळी मेळा चे दीपप्रज्वलन करून उदघाटन करताना अशोक जैन, अनिल कांकरिया, निशा जैन, मनोज परमार, अंबिका जैन. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अनुभूती विद्या निकेतन आणि अनुभूती बाल निकेतनद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. अनुभूती उद्यमिता कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘दिवाळी मेळा २०२५’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते. यात…

Read More

ज्ञानामुळे आत्मकल्याण होते : प. पू. डॉ. हेमप्रभाजी म. सा.

ll आत्मोत्कर्ष वाणी ll रत्नजळीत पिंजऱ्यात पक्षीला बांधले तरी त्याचे खरे स्वातंत्र हे आकाश उडण्यात आहे. त्याप्रमाणेच मनुष्याजवळ कितीही धन संपत्ती असेल तरी अंतिम क्षणावेळी त्याचे रक्षण त्याच्या हातून घडलेल्या कर्मामुळेच होते. जन्म-मृत्यूची भिती मनात ठेऊन मनुष्य सत्कर्म विसरतो, ही भिती मनात ठेऊ नये, फक्त चांगल्या कर्मांना प्राधान्य दिले पाहिजे. चांगले धर्माचारण करण्यासाठी संयम ही आपल्यातील…

Read More

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

रत्नागिरी ( वास्तव पोस्ट ) : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आज मंडणगड, जिल्हा रत्नागिरी येथील ‘दिवाणी व फौजदारी न्यायालया’च्या नूतन इमारतीचे उद्घाटन व कोनशिला अनावरण संपन्न झाले. यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘दिवाणी व फौजदारी न्यायालया’च्या नूतन इमारतीच्या परिसरात महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

Read More

वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे ‘कृतज्ञता तालांजली’ कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : दि. ५ सप्टेंबर २०२५ शिक्षकदिनी अर्थातच गुरूदिनी तालमणी पं. जयंत नाईक यांना देवाज्ञा झाली. जळगाव आकाशवाणी, चांदोरकर प्रतिष्ठान, बालगंधर्व संगीत महोत्सवा सह जळगाव, नाशिकच्या सांस्कृतिक परिघाशी त्यांचं अतुट नातं होतं. त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. असा हा प्रतिभासंपन्न कलावंत काळाच्या पडद्याआड गेला तो कायमचाच. अश्या या तालमणी प्रती कृतज्ञता व्यक्त…

Read More

मुले बनणार उद्योजक, अनुभूती विद्या निकेतनमध्ये ‘दिवाळी मेळा २०२५’ उपक्रम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अनुभूती विद्या निकेतन आणि अनुभूती बाल निकेतनद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. आता दिवाळीच्या सुट्यांपूर्वी ‘दिवाळी मेळा २०२५’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन १२ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. अनुभूती उद्यमिता कार्यक्रमाच्या अंतर्गत हा उपक्रम घेण्यात येणार आहे. यावेळी अशोक जैन, अनिल जैन, अजित जैन, अतुल जैन आणि…

Read More

अनुभूती निवासी स्कूलमधील सीआयएससीई क्रिकेट स्पर्धेत पश्चिम बंगाल विजेता

सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील विजेत्या तामिळनाडू संघासोबत अतुल जैन, निशा जैन, प्राचार्य देबासीस दास जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अनुभूती निवासी स्कूलच्या क्रीडांगणावर सुरु असलेल्या सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धेत गुरुवारी अंतिम लढत पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये झाली. एकतर्फी झालेल्या या लढतीत पश्चिम बंगालच्या संघाने केरळवर ८२ धावांनी विजय मिळवत विजेतेपद…

Read More

‘युवारंग २०२५’ महोत्सवाचे मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभाग व जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवारंग २०२५’ या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. गेल्या २५ वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन आज मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री…

Read More

सीआयएससीई क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदासाठी पश्चिम बंगाल आणि केरळ संघात अंतिम लढत

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अनुभूती निवासी स्कूलच्या पटांगणावर सुरु असलेल्या सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धेत बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात केरळ आणि पश्चिम बंगालने विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. केरळने महाराष्ट्राचा तर पश्चिम बंगालने तामिळनाडूच्या संघाचा पराभव केला. आता दोन्ही संघात विजेतेपदासाठी गुरुवारी लढत होणार आहे. उपात्यंफेरीच्या पहिला सामना पश्चिम बंगाल आणि…

Read More

पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन

नवी मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुंबई आणि नवी मुंबईतील लोकांची वर्षानुवर्षे चाललेली प्रतीक्षा संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार ८ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (एनएमआयए) उद्घाटन केले. अदानी समूहाने १९,६५० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि…

Read More

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आपले वर्षभराचे वेतन

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्यात मुसळधार पाऊस व महापुरामुळे शेती आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बाधित नागरिकांना मदत पुरविण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय्य दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतःचा वर्षभराचा पगार मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला. मंत्री महाजन…

Read More

अनुभूती निवासी स्कूलमध्ये ‘क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५’ स्पर्धचे उद्घाटन

क्रीडा ज्योत प्रज्वलित करताना खेळाडू जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जीवनात कोणतेही मोठे कार्य एकट्याने करता येत नाही त्यासाठी संघ सोबत हवा असतो. खेळातूनच ही सांघिकतेची प्रेरणा मिळते. ही खेळांतील सांघिकता जीवनातही अंगिकारावी व शिक्षणासोबतच खेळातून देशहित जोपासावे. असा सल्ला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व आमदार रोहित पवार यांनी खेळाडूंना दिला. अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी…

Read More

अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

मेहरूण तलावाजवळील जैन ड्रीम स्पेस क्रिडांगणाची पाहणी करताना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अॅपेक्स कौन्सिलचे सदस्य अतुल जैन सोबत जैन स्पोर्स्टस अकॅडमीचे सहकारी जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई-१७ वर्षाखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ आयोजन करण्यात आले आहे. उद्या दि. ६ रोजी संध्याकाळी ५ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होईल. ही स्पर्धा दि. ७…

Read More

गांधी जयंती सप्ताहानिमित्त शिरसोली प्र.न येथे सामूहिक स्वच्छता अभियान

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महात्मा गांधी जयंती सप्ताहाच्या निमित्ताने शिरसोली प्र.न येथे गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि ग्रामपंचायत शिरसोली प्र.न यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायत परिसरात राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेत गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या उपक्रमात ग्रामपंचायत सरपंच व सदस्य हिलाल भिल्ल, रामकृष्ण काटोले, मुदस्सर पिंजारी, श्रावण ताडे…

Read More

नाशिक येथील नवीन रिंग रोड व साधूग्रामचे काम त्वरित पूर्ण करावे : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७’ संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. कुंभमेळा श्रद्धा, संस्कृती आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक असल्याने सर्व कामे दर्जेदार आणि गतीने पूर्ण करावीत तसेच नाशिक येथील नवीन रिंगरोडसह साधूग्राम व टेंटसिटीसाठीची भूसंपादनाची कामेही वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री फडणवीस…

Read More
error: Content is protected !!