Home » Archives for जानेवारी 2024

अर्थसंकल्प २०२४; सरकारकडून आश्चर्याची अपेक्षा

मुंबई दि.३१ ( प्रतिनिधी )- अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प (अंतरिम बजेट 2024) सादर करणार आहेत. कारण काही महिन्यांनी देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या मिनी बजेटकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत. यावेळी अर्थसंकल्पात सरकार महिला व्यावसायिकांसाठीही काही ऑफर जाहीर करु शकते. असं असलं तरी, सरकार ज्या प्रकारे देशातील बोर्ड आणि…

Read More

मार्च २०२४ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र शाळांसाठी ऑनलाईन उपलब्ध

पुणे दि. ३१ ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा मार्च २०२४ साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सूचित करण्यात आले आहे. सर्व…

Read More

मोठी बातमी : जिल्हा पोलीस अधिक्षकांची बदली; रेड्डी नवे एसपी .

जळगाव दि. ३१ ( प्रतिनिधी )जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांची बदली झाली असून त्यांच्या जागी एमसीव्ही महेश्‍वर रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर काही वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात जळगावचे पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांची बदली करण्यात आली आहे. लक्षणीय बाब म्हणजे अवघ्या काही महिन्यांमध्ये त्यांची बदली करण्यात…

Read More

ज‍िल्ह्यातील आद‍िवासी पाड्या – वस्त्यांना जोडण्यासाठी न‍िधी उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

जिल्हा वार्षिक आद‍िवासी घटक योजना प्रारूप आराखड्याचा आढावा जळगाव दि .३१ ( प्रतिनिधी ) ज‍िल्ह्यात ज्या आद‍िवासी पाड्या – वस्त्यांचा रस्त्याअभावी संपर्क तुटला असल्यास अशा गावांचे सर्वेक्षण करण्यात यावे. अशा गावांना जोडण्यासाठीच्या रस्ते कामांना ब‍िरसा मुंडा रस्ते व‍िकास योजनेतून शंभर टक्के न‍िधी उपलब्ध करून द‍िला जाईल. अशी ग्वाही राज्याचे आद‍िवासी व‍िकासमंत्री विजयकुमार गा‍व‍ित यांनी आज…

Read More

तर …१० फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार ; जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

रायगड दि. ३० ( प्रतिनिधी ): मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकार विरोधात आंदोलनाचे हत्यार उगारले आहे. राज्य सरकारने येत्या १५ दिवसात सगेसोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करावी. ९ तारखेपर्यंतची ही डेडलाईन आहे. जर या कालावधीत कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर मी येत्या १० फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण करणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी…

Read More

यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी विनोदी अभिनेते अशोक सराफ यांची निवड

मुंबई दि .३० ( प्रतिनिधी ) मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये चरित्र आणि विनोदी भूमिका करणारे अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहिर करण्यात आला. मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तशी घोषणा केली . सर्वात प्रथम दादा कोंडके यांनी अशोक सराफ यांना पांडू हवालदार या चित्रपटात अभिनेता म्हणून संधी दिली होती. त्यानंतर आलेल्या राम राम…

Read More

महात्मा गांधीजींप्रमाणे स्वयंशिस्त, सत्य व प्रामाणिकपणा अंगिकारा- इति पाण्डेय

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या १२ दिवसीय ग्राम संवाद सायकल यात्रेस आरंभ जळगाव, दि. ३० (प्रतिनिधी) – ‘महात्मा गांधीजींप्रमाणे स्वयंशिस्त, सत्य आणि प्रामाणिकपणाच्या मार्गाने चालले तर, आपण खरे असल्याचे आपल्याला सिद्ध करण्याची आवश्यकता भासत नाही. खोट्याचे अनेक चेहरे असतात परंतु सत्याचा एकच चेहरा असतो असे म्हटले जाते. गांधीजींच्या सहज सोप्या तत्त्वज्ञानाचा अंगिकार आपण करावा’ असे मोलाचे विचार…

Read More

पकिस्तानच्या राजकारणात खळबळ ; इम्रान खान यांना १० वर्षांची शिक्षा

नवी दिल्ली दि .३० ( प्रतिनिधी ) पाकिस्तानचे क्रिकेटपटू तथा माजी पंतप्रधान इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना सायफर प्रकरणात १० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. इम्रान खान सत्तेत असताना पाकिस्तानच्या गोपनीयतेच्या कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.आज दि. ३० रोजी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अबुल हसनत जुलकरनैन यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी…

Read More

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला‌ साहित्य संमेलन तयारीचा आढावा

जळगाव दि .२९ ( प्रतिनिधी ) जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज अमळनेर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अंतिम टप्प्यातील तयारीचा आढावा घेतला. साहित्य संमेलनाच्या आयोजनात कोणतीही कमतरता राहणार नाही. याची दक्षता घेण्याच्या प्रशासनाला व आयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांना‌ त्यांनी सूचना दिल्या. अमळनेर येथे २ ते ४ फेब्रुवारी २०२४ कालावधीत ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य…

Read More

गांधी रिसर्च फाऊंडेशनची आजपासून ग्राम संवाद सायकल यात्रा

जळगाव दि.२९ ( प्रतिनिधी ) गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्ताने ( हुतात्मा दिनी, दि. ३० जानेवारी ) स्वस्थ समाज व सामाजिक समरसता निर्माण करण्याच्या उद्देशाने समाज प्रबोधनासाठी व गांधी विचार प्रचार-प्रसारासाठी आयोजित “ग्राम संवाद सायकल यात्रे” ची आजपासून सुरुवात होत आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय यांच्या हस्ते सायकल यात्रेस हिरवी झेंडी…

Read More

पुढील महीन्यात राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक ; महाराष्ट्रातही ६ जागांवर होणार मतदान

मुंबई ( प्रतिनिधी ) दि. २९, आज निवडणूक आयोगाने १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणुकीच्या तारखा आज दि .२९ सोमवार रोजी जाहीर केल्या. पुढील महिन्यात २७ फेब्रुवारीला या सर्व ५६ जागांसाठी मतदान होणार असून त्यात महाराष्ट्रातील ६ जागांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे मतदानाच्याच दिवशी निकाल लागणार आहेत. याबाबत ८ फेब्रुवारी रोजी निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यात…

Read More

पक्षांतर बंदी कायदा चिकित्सा समितीचे अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची नियुक्ती ; विरोधकांकडून मात्र टीकेची झोड

मुंबई ( प्रतिनिधी ): दि .२९, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पक्षांतर बंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे . राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती पक्षांतर बंदी कायद्याची चिकित्सा करुन आढावा घेईल. मुंबईत महाराष्ट्र विधान भवनात आयोजित ८४व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी दोन दिवसीय परिषदेच्या समारोपा प्रसंगी…

Read More

जळगाव येथे संत गाडगेबाबा जयंती उत्सव आयोजना निमित्त सर्व समाज समावेशक सभा संपन्न.

जळगाव ( प्रतिनिधी ) दि . २८, निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती २३ फेब्रुवारी रोजी साजरी होत आहे . जळगाव येथे यावर्षी सर्व समाज समावेशक गाडगेबाबा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावयाचा आहे . यात संत गाडगेबाबा यांच्या नावाने विविध कार्यरत सामाजिक संस्था व संघटना तसेच त्यांच्या विचाराने प्रेरीत झालेल्या लोकांचा समावेश अत्यावश्यक आहे…

Read More

राजकीय भूकंप , बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राजीनामा ; ९ व्यांदा घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ .

मुंबई ( प्रतिनीधी ) दि .२८, नितीश कुमार यांनी त्यांच्या बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केल्यानंतर आज बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे आता बिहारमध्ये राजकीय समिकरणं पुन्हा एकदा बदलली आहेत. बिहारमध्ये याआधी आरजेडी आणि जेडीयूचं सरकार होतं. परंतु या सरकारमधून बाहेर पडून भाजपा सोबत जाण्याचा निर्णय नितीश कुमार यांनी घेतल्याने आता बिहारमधील…

Read More

“गौराई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका वाकोद” येथे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुरू

वाकोद दि. २८ ( प्रतिनिधी ) – आगामी काळात होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी वाकोद आणि पंचक्रोशीतील युवकांसाठी भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन संचलित गौराई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिकेतर्फे मोफत मार्गदर्शन वर्ग प्रारंभ झालेला आहे. सदर मार्गदर्शन वर्ग शनिवार व रविवारी सकाळी दहा ते पाच या वेळात गौराई कृषी तंत्रनिकेतन या ठिकाणी संपन्न…

Read More
error: Content is protected !!