जळगाव जिल्ह्यात ३०० ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम !
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यातील ग्रामपंचायती सक्षम, स्वयंपूर्ण व समृद्ध व्हाव्यात, तसेच गावांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित व्हावा, या उद्दिष्टाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल (IAS) यांच्या संकल्पनेतून ‘समृद्ध ग्रामपंचायत अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील निवडलेल्या ३०० ग्रामपंचायतींमध्ये सोमवार, दि. ३० जून रोजी भव्य स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली….
