मू.जे. महाविद्यालयामध्ये ‘कवी कालिदास’ विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : “अपूर्व ज्ञान कौशल्य आणि प्रतिभेच्या बळावर महान कवी कालिदास यांनी कालातीत साहित्य निर्मिती केली. त्यांनी रचलेल्या साहित्य कृतींमुळे निसर्ग, मानव आणि साहित्य सौंदर्याचा विस्तार लक्षात आला. कल्पनेची उंची, शब्दांचा योग्य जागी वापर आणि लालित्याचा समावेश हा कालिदासाच्या साहित्याचा गाभा राहिला आहे. त्यांनी आपल्या पूर्व परंपरांचा, पूर्व साहित्याचा गाढा अभ्यास…
