इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या घरावर ड्रोन हल्ला !

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : इस्रायल विरुद्ध पॅलेस्टिन, हमास व लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या युद्धात आता मोठा भडका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे इस्रायलच्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात हिजबुल्लाह संघटनेने आता थेट इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना लक्ष्य केले आहे. लेबनॉनमधील हिजबुल्लाह संघटनेने नेत्यानाहू यांच्या घरावर ड्रोन हल्ला केला आहे. इस्राइल सरकारने हा…

Read More

लाडकी बहीण योजनेचा हप्ता सरकारने थांबवला ! निवडणूक आचारसंहितेचा फटका

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : विधानसभा २०२४ च्या निवडणुकीमुळे राज्यात आचारसंहिता सुरु असून याचा फटका महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेला बसला आहे. लाडकी बहीण योजनेचे हप्ते तूर्त थांबवण्याचा निर्णय महिला व बालकल्याण खात्याकडून घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सुमारे १० लाख महिला नोव्हेंबर महिन्याच्या हफ्त्यापासून सध्यातरी वंचित राहणार आहेत. महिला व बालकल्याण विभागाची ‘लाडकी…

Read More

नाना पटोले असतील तर महाविकास आघाडीची जागावाटपवर बैठक होणार नाही : ठाकरे गटाची भूमिका !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीत ठाकरे गट आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मोठा वाद झाला असल्याची बातमी समोर येत आहे. विदर्भातील जागांच्या वाटपावरून हा वाद निर्माण झाला. संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यातील वाद इतका तीव्र झाला की, ठाकरे गटाने नाना पटोले असतील तर बैठक होणार नाही, अशी भूमिका घेतली. या वादावर…

Read More

सलमान खानला जीवे मारण्याची पुन्हा धमकी ; यावेळेस मागितली ५ कोटींची खंडणी !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या अडचणीत वाढ होत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिश्नोईची गँग सलमान खानच्या मागे हाथ धुऊन लागली आहे. अलीकडेच मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोईच्या शूटरला अटक केली आहे. सलमान खानला मारण्यासाठी लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने २५ लाख रुपयांची सुपारी कशी घेतली हे या शूटरने…

Read More

डॉक्टर उल्हास पाटील विधी महाविद्यालयात ‘ताण-तणाव व कॉपीमुक्त परीक्षा अभियान’ कार्यशाळा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि गोदावरी फाउंडेशनचे डॉक्टर उल्हास पाटील विधी महाविद्यालय जळगाव, विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी ताण-तणाव व कॉपीमुक्त परीक्षा अभियान कार्यशाळा आज दि.१८ रोजी सकाळी ८:३० वाजता आयोजित करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडवोकेट पूजा व्यास यांनी केले. परीक्षा व मूल्यमापन मंडळ…

Read More

राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शासकीय विश्राम गृह जळगांव येथे राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आहे होते. सदर बैठकीसाठी राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पठारे यांच्या अध्यक्ष ते खाली संपन्न झाली. बैठकीमध्ये उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून दीपक बळीराम सपकाळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र…

Read More

मु.जे. महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन निवड चाचणी शिबिर संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव येथे चान्सलर ब्रिगेड आपत्ती व्यवस्थापन शिबिर निवड चाचणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सं.ना. भारंबे यांनी भुषवले. तसेच शिबिराचे उद्घाटन डॉ.सचिन नांद्रे यांनी दीप प्रज्वलन करून केले. आपत्ती व्यवस्थापन शिबिर विद्यार्थ्यांसाठी समाजासाठी व देशासाठी किती महत्त्वाचे आहे याचे सखोल मार्गदर्शन प्राचार्य…

Read More

रवी राणांना मोठा धक्का ; विश्वासू सहकाऱ्याने सोडली साथ

अमरावती ( वास्तव पोस्ट ) : अपक्ष आमदार रवी राणा यांना अमरावतीत मोठा धक्का बसला आहे. राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे मुख्य प्रवक्त्याने संघटनेचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच सर्वत्र राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. तसेच आता इनकमिंग आऊटगोईंगला सुरुवात झालेली दिसून येत आहे. सध्या महायुतीतून अनेक नेते, पदाधिकारी हे महाविकासाआघाडीत प्रवेश…

Read More

डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयात ‘करिअर गाईडन्स’ या विषयावर मार्गदर्शन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : उल्हास पाटील विधी महाविद्यालयात भुषण काळे प्रथम वर्ग दिवाणी न्यायाधीश जामनेर यांनी करिअर गाईडन्स यात विधी क्षेत्रातील विविध संधी या विषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. विधी क्षेत्र हे अतिशय व्यापक असून त्यात विद्यार्थी आपले करिअर कसे घडवू शकतो याबाबत विस्तृतपणे मार्गदर्शन केले. तसेच विधी क्षेत्रात उत्तम संधी उपलब्ध असून…

Read More

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना मतदान ओळखपत्र प्रदान

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्यात विधानसभेसाठी दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार असून मतमोजणी दि.२३ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे प्रथम नागरिक राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हेदेखील मुंबई शहर जिल्ह्यातील १८५ मलबार हिल मतदार संघातील मतदार म्हणून आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या पार्श्वभूमीवर १८५ मलबार हिल मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी…

Read More

अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय येथे माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात सुरुवातीला डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी भाषिक कौशल्य या विषयावर के.सी.ई. सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्राध्यापक गोपीचंद…

Read More

के.सी.ई. सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त के.सी.ई. इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांत वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. दरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांचे हस्ते डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी, अकॅडमिक डीन डॉ. प्रज्ञा विखार, पॉलिटेक्निकचे समन्व्यक…

Read More

विधानसभा निवडणूक २०२४ : बिगुल वाजले ; राज्यात आचारसंहिता लागू !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित होतील. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबद्दलची मोठी…

Read More

व्यक्तिमत्त्व विकासासाठी आपल्यातील कौशल्ये ओळखणे आवश्यक : डॉ. आशुतोष पाटील

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आपले व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी आपल्यातीलं अंत:प्रेरणा महत्त्वाची ठरते. प्रत्येकात कोणती ना कोणती कौशल्ये असतात. त्याला चालना देण्यासाठी आपण श्रवण, वाचन, लेखन आणि संभाषण कौशल्ये अंगीकृत करणे आवश्यक आहे असे मत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रसिद्ध समीक्षक प्रा.डॉ. आशुतोष पाटील यांनी व्यक्त…

Read More

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा क्र.२ पोकरा अंतर्गत जिल्ह्यात ३१९ गावांचा समावेश

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प टप्पा-१ च्या यशस्वीतेमुळे नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प टप्पा-२ राबविण्यास कृषी व पद्युम विभागाच्या शासन निर्णय क्र. नादेकृ ४६२२/प्र.क्र.९४/८-अे/मंत्रालय/मुंबई, दि.१४ऑक्टोबर २०२४ अन्वये महाराष्ट्र शासनाची तत्वतः मान्यता देण्यात आलेली आहे. नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या टप्पा-२ ची अंमलबजावणी विहित वेळेत व सुरळीत व्हावी या दृष्टीकोनातून…

Read More
error: Content is protected !!