शिक्षक भरती उमेदवारांना मोठा दिलासा, तक्रार निवारण व दुरुस्ती समितीची स्थापना ; ईमेलद्वारे तक्रार करता येणार

नाशिक | दि.२८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– राज्यभरात जवळपास ११ हजार शिक्षकांची भरती ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून केली जाणार आहे. २५ जानेवारीला पर्याय निवडलेल्या शिक्षकांची गुणवत्ता जाहीर करण्यात आली आहे. या प्रक्रियेबाबत कोणाची काही शंका किंवा तक्रार असल्यास त्यासाठी तक्रार निवारण व दुरुस्ती समितीची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे…

Read More

मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा

मुंबई | दि.२७ ( वास्तव पोस्ट न्यूज )– महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात दररोज काहीना काही घडामोडी घडत असुन राजकीय चर्चेंना उधाण आले आहे. आज अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राज्यसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणारे राज्यसभेचे निवडून आलेले सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला…

Read More

जळगाव पोलीस कवायत मैदानावर जिल्हा प्रशासनाद्वारे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन

जळगाव | दि.२७ ( वास्तव पोस्ट न्यूज )– जळगाव जिल्हा प्रशासनाद्वारे महा संस्कृती महोत्सवाचे दि.२८ फेब्रुवारी ते दि.०३ मार्च, २०२४ कालावधीत पोलीस कवायत मैदान जळगाव येथे सायं ०५:३० ते ०९:३० या वेळेत सर्व जळगाव जिल्हावासियांना महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे . या महासंस्कृती महोत्सवात पाचही दिवशी वेगवेगळे रंगारंग कार्यक्रम असतील. त्यात बुरगुंडा, भारुड, पारंपरिक…

Read More

महायुती सरकारचा अंतरीम अर्थसंकल्प दिशाहीन व निराशाजनक : अमित विलासराव देशमुख

मुंबई | दि.२७ (वास्तव पोस्ट न्यूज )– राज्यातील महायुती सरकारच्या वतीने आज मांडण्यात आलेला अंतरीम अर्थसंकल्प दिशाहीन आणि राज्यातील जनतेची निराशा करणारा आहे. पायाभूत सुविधा उभारणीला प्राधान्य देऊन हा अर्थसंकल्प जनहितकारी करण्याची संधी या सरकारला साधता आली नाही, अशी प्रतिक्रीया राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली…

Read More

अभिनेत्री जयाप्रदा फरार घोषित !अटकेचे आदेश जारी ; नेमके काय आहे प्रकरण ?

रामपूर | दि.२७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -उत्तर प्रदेशातील रामपूर येथील खासदार-आमदार दंडाधिकारी ट्रायल कोर्टाने मंगळवारी माजी खासदार जयाप्रदा यांना न्यायालयात हजर न राहिल्याने त्यांना फरार घोषित केले. तसेच अटकेचे आदेश देण्यात आले आहेत. सीओ यांच्या नेतृत्वाखालील पथकावर अटकेची जबाबदारी देण्यात आली आहे. या पथकाला माजी खासदाराला अटक करून ६ मार्च रोजी न्यायालयात हजर…

Read More

अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे बाधित नागरिक व शेतकरी यांना मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या ५ कलमी सूचना

जळगाव | दि.२७ ( वास्तव पोस्ट न्यूज )– काल रात्री जिल्ह्यात विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ बाधित नागरिक व शेतकरी यांना मदतीसाठी सर्व तालुक्यांना जळगाव ५ कलमी सूचना जारी केल्या आहेत . १. इतर सज्जाच्या तलाठी गावांचे वाटप करून पुढील ४८ तासांत पंचनामा पूर्ण करा. कोणतेही…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी.एम. किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांच्या निधीचे होणार वितरण

मुंबई | दि.२७ ( वास्तव पोस्ट न्यूज )– पी.एम. किसान सन्मान निधी योजनेच्या माहे डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४ कालावधीतील १६ वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवार, दि २८ फेब्रुवारी, २०२४ रोजी यवतमाळ येथील समारंभात वितरीत होणार आहे. पी. एम. किसान योजने अंतर्गत रू. २००० तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत दुसरा…

Read More

श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा महाकुंभमधील स्पर्धांची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाने घेतली दखल

मुंबई | दि.२७ ( वास्तव पोस्ट न्यूज )– श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभमध्ये एकाचवेळी सर्वाधिक १७ वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा घेण्याची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाने दखल घेतली असून याबाबतचे प्रमाणपत्रही त्यांनी वितरित केले आहे. याबद्दल अत्यंत अभिमान आणि आनंद वाटत आहे असे मत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले. कौशल्य,…

Read More

केळी पिक विमा २०२२/२३ जळगाव जिल्हा पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध

जळगाव | दि. २७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – केळी फळपीक विम्याच्या प्रस्तावांवर निर्णय घेण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. विविध प्राप्त प्रस्तावांवर निर्णय घेऊन पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. केळी पिकविमा २०२२-२०२३ मधील जळगाव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करुन पाहु शकतात….

Read More

पर्यावरणीय संसाधनाचा नाश रोखण्यासाठी वन व पोलिस विभागाकडून संयुक्त बैठक संपन्न

जळगाव | दि.२७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे पर्यावरणीय संसाधनांचा नाश रोखण्यासाठी बैठक संपन्न झाली. वन विभाग, पोलीस विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांनी व समनव्यातुन पर्यावरणाचा ऱ्हास रोखणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणेबाबत चर्चा करण्यात आली. वनव्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभागांकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद…

Read More

मानव सेवा माध्यमिक विद्यालय जळगाव येथे  इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

जळगाव | दि. २६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मानव सेवा माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला. प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. आर. एस डाकलियाजी अध्यक्ष स्थानी होते. त्याचप्रमाणे संस्थेचे मानद सचिव मा. विश्वनाथ जोशीजी, माध्यमिक मुख्याध्यापिका मा. सौ.प्रतिभा सूर्यवंशी, प्राथमिक मुख्याध्यापिका मा.सौ. माया अंबटकर, बालवाडी मुख्याध्यापिका मा. सौ. मुक्ता…

Read More

पहिल्या शालेय जैन चॅलेंज चषक तायक्वांडो स्पर्धेत खेळाडूंकडून पदकांची कमाई

जळगाव | दि. २६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पहिल्या जैन चॅलेंज तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन दि. २५ फेब्रुवारीला केले होते या स्पर्धा अनुभूती इंटरनॅशनल निवासी स्कूलमधील बॅडमिंटन हॉल येथे घेण्यात आल्या. या स्पर्धेत रावेर, जामनेर, जळगाव, शिरसोली, पाचोरा, चाळीसगाव येथील विविध शाळेतील १६० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. तायक्वांडो स्पर्धेत सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा पहुर…

Read More

जळगाव एमआयडीसीतील गुटख्याच्या दोन गोदामांवर छापा;बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक

जळगाव | दि.२६ ( वास्तव पोस्ट न्यूज )– राज्यात बंदी असलेल्या पानमसाला, सुगंधित तंबाखू, गोड सुपारीचा साठा केलेल्या गोदामावर कारवाई करत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा टाकला. या ठिकाणाहून १४ लाख रुपयांचा साठा जप्त केला. ही कारवाई औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या दोन गोदामांमध्ये करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात हिरालाल उत्तम पाटील…

Read More

आदिवासी बांधवांना दोन वर्षात घरकुल देणार :आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत

चंद्रपूर | दि.२६ ( वास्तव पोस्ट न्यूज )– भारत सरकारने प्रत्येक गावापर्यंत रस्ते, वीज व पाणी देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. महाराष्ट्र शासन आणि आदिवासी विकास विभागही यासाठी प्रयत्नशील असून येत्या दोन वर्षात १०० टक्के आदिवासी बांधवांना घरकुलचा लाभ देण्यात येईल, अशी ग्वाही आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दिली. दरम्यान चंद्रपूर येथील नियोजन…

Read More

राज्यातील १५ आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन आणि राष्ट्राला समर्पण

मुंबई | दि.२६ ( वास्तव पोस्ट न्यूज )– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे १५ आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि राष्ट्राला समर्पण करण्यात आले. यानिमित्ताने मुंबईत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. महाराष्ट्रात ५ ठिकाणी क्रिटिकल केअर हॉस्पिटल ब्लॉकसाठी सुमारे १३५.०५ कोटी रुपये खर्च येणार आहे. जिल्हा…

Read More
error: Content is protected !!