नाशिक परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मॅट मध्ये धाव

नाशिक दि. ६ ( प्रतिनिधी ) – नाशिक परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर-पाटील यांनी नुकत्याच झालेल्या बदलीमुळे केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरणात धाव घेतली आहे. सेवानिवृत्तीस चार महिने बाकी असताना तसेच कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच गृह विभागाने बदली केल्याने त्यांनी ही याचिका दाखल केल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या…

Read More

१५ फेब्रुवारीला मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावणार ; मंत्री दीपक केसरकर

मुंबई दि. ६ ( प्रतिनिधी ) – मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्य पातळीवर सर्वेक्षण चालू असलेलं सर्वेक्षणाचं हे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी येत्या १५ फेब्रुवारी रोजी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावलं जाईल . याबाबत मंत्री दीपक केसरकर म्हणाले, की मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी चालू असलेलं सर्वेक्षण पूर्ण होत आलं…

Read More

निवासी डॉक्टरांपाठोपाठ ‘या’ तारखेपासुन राज्यातील शिक्षकेतर कर्मचारीही काम बंद आंदोलनावर

पुणे दि. ६ ( प्रतिनिधी ) – राज्यात आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता महाराष्ट्र सरकार मतदारांना खूष करण्यासाठी वेगवेगळ्या योजना पूर्ण करत आहे . एकीकडे मराठा आरक्षणाचा विषय, दुसरीकडे निवासी डॉक्टरांच्या मागण्या आणि त्यात भर आता शिक्षकेतर कर्मचारीही संपावर जाणार आहेत. यामुळे राज्यात सरकारची सर्वच बाजूने कोंडी होताना दिसत आहे. कोकणातील सावंतवाडीमध्ये झालेल्या अधिवेशनात शिक्षकेतर…

Read More

जळगाव तहसीलदार पदी शीतल राजपूत यांनी स्वीकारला पदभार

जळगाव दि. ५ ( प्रतिनिधी) – जळगाव येथे नव्याने बदलून आलेल्या तहसीलदार शीतल राजपूत यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. जळगावचे तहसीलदार नामदेव पाटील यांची अलीकडेच बदली झाली होती. यानंतर त्यांच्या जागी फुलंब्री येथून शीतल राजपूत यांची बदली झाल्याचे शासकीय आदेश जारी करण्यात आले होते. यानंतर आज त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. कार्यभार घेताच त्यांनी…

Read More

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारत विजयी ; इंग्लंड १०६ धावांनी पराभूत

विशाखापट्टणम दि .५ ( प्रतिनिधी ) – विशाखापट्टणम येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. यजमान भारतीय संघाने हा सामना जिंकून इंग्लंडसोबत पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता. इंग्लंड संघाने विजयासाठी आवश्यक असलेल्या धावांचा पाठलाग करतांना कालच्या ६७/१ धावसंख्येवरुन चौथ्या दिवशी…

Read More

विपश्यनेमुळे आयुष्यातील तणावाला सामोरे जाण्याची शक्ती मिळते ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई दि.५ ( प्रतिनिधी ) – विपश्यना शिक्षक एस.एन. गोएंका यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात दृकश्राव्य माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विपश्यना विषयाचे महत्त्व विषद केले . विपश्यना ही प्राचीन भारताची आणि आधुनिक विज्ञानाची अनोखी देणगी असून या विपश्यनेमुळे आधुनिक जीवनशैलीत ताणतणाव दूर ठेवता येऊ शकतात. अगदी तरुणांपासून ते…

Read More

१०० वे साहित्य संमेलन हे जागतिक स्तरावर नावजले जाईल ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अमळनेर दि.५ ( प्रतिनिधी ) – ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले. साहित्य संमेलन ही आपली थोर परंपरा असून सांस्कृतिक विचारांची ही गंगा अखंड वाहते आहे. शंभराव्या साहित्य संमेलनाकडे वाटचाल करीत असून १०० वे साहित्य संमेलन हे जागतिक स्तरावर नावाजले जाईल एवढ्या भव्य प्रमाणावर त्याचे आयोजन करण्यात येईल,…

Read More

वसतिगृहामुळे मागासवर्गीय विद्यार्थिनींच्या शिक्षणाची वाट सुकर ; पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील

अमळनेर तालुक्यात विकास कामांमध्ये विद्यार्थी हिताला प्राधान्य ; मंत्री श्री अनिल पाटील अमळनेर दि. ५ ( पतिनिधी ) – सामाजिक न्याय विभागाच्या मुलींचे शासकीय वसतिगृह इमारतीचे लोकार्पण संपन्न सुसज्ज इमारतीत १०० विद्यार्थिनींना लाभ मिळणार आहे .शासनाने समाजातील वंचित घटकाच्या विकासासाठी प्राधान्य दिले असून शासकीय वसतिगृहांमुळे विद्यार्थिनींची शिक्षणाची वाट सुकर होणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री श्री…

Read More

CASGC 2024: न्याय संकल्पनेत पर्यावरणीय न्यायाचाही समावेश असावा ; राष्ट्रकुल परिषदेत राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू

दिल्ली दि.५ ( प्रतिनिधी) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल नवी दिल्ली येथे राष्ट्रकुल लीगल एज्युकेशन असोसिएशन (सीएलईए) च्या – राष्ट्रकुल देशांचे ॲटर्नी आणि सॉलिसिटर जनरल यांची परिषद (CASGC) २०२४ च्या समापन सोहळ्याला उपस्थित राहून संबोधित केले. समाजाच्या नैतिक व्यवस्थेची व्याख्या करण्यासाठी सामाजिक, आर्थिक आणि राजनीती या तीन वैशिष्ट्यांचे एकत्रित येणे आवश्यक आहे, असे त्या…

Read More

साहित्यिक पद्मश्री आदरणीय श्री. गिरीशजी प्रभुणे यांचेकडून समतोल प्रकल्पाच्या कार्याची प्रशंसा

जळगाव दि. ३ ( प्रतिनिधी )– आज दि ३ रोजी जळगाव रेल्वे स्टेशन परिसरात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक आदरणीय श्री.गिरीशजी प्रभुणे यांच्यासोबत ग्रेट भेट झाली. ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी अमळनेरला आले होते आणि परतीचा प्रवास रेल्वेने जळगावहून करणार होते. रेल्वेला विलंब झाल्यामुळे आमची भेट झाली. आदरणीय गिरीशजींना २०२१ मध्ये सामाजिक कार्य श्रेणीमध्ये…

Read More

“आपल्या घराचे स्वत: तीर्थंकर बना” – प.पू. प्रविणऋषीजी म.सा.

जळगाव दि. ४ ( प्रतिनिधी )– ‘कुठल्याही व्यक्तीला, दोषाला सुधारण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती, कडक अनुशासन करणारे गुरुजन, आई-वडील त्याला वाईट दिसतात हे वास्तव आहे. आपले ज्याच्याशी वैर आहे त्याविषयी आपण जेवढा क्रोध करत नाही तेवढा आई-वडील, सासू-सासरे यांच्याविषयी करतो. मारलेली ‘थप्पड’ लक्षात राहते मात्र प्रेमाने दिलेली ‘थप्पी’ हे लक्षात राहत नाही. त्यासाठी चांगले व्यक्तिमत्व घडवणाऱ्या…

Read More

गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाडांना ११ दिवसांची पोलिस कोठड़ी

ठाणे दि.३ ( प्रतिनिधी )– उल्हासनगर हिललाईन पोलिस स्टेशनमध्ये काल झालेल्या गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाड यांना आज उल्हासनगर कोर्टात हजर केले .व्हीसी द्वारे आरोपींना हजर करण्याची विनंती होती, मात्र कोर्टाकडून ही विनंती फेटाळण्यात आली . उल्हासनगर कोर्टाने गणपत गायकवाडांना ११ दिवसांची पोलिस कोठड़ी सुनावली . काही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून कोर्ट परिसरात पोलिसांचा तगड़ा बंदोबस्त…

Read More

अडवाणी यांना भारतरत्न जाहीर ; माझे जीवन माझ्यासाठी नाही तर देशासाठी समर्पित आहे.

दिल्ली दि .३ ( प्रतिनिधी ) – अयोध्येतील राम मंदिर आंदोलनातील सर्वात मोठा चेहरा लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली . ९६ वर्षीय अडवाणी यांनी स्वतः या संदर्भात एक निवेदन जारी केले . लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “आज मला प्रदान करण्यात आलेला ‘भारतरत्न’ मी…

Read More

विशाखापट्टणम कसोटीत दुसऱ्या दिवशी “जैस्वाल” द्विशतक झळकवण्यात “यशस्वी”

विशाखापट्टणम दि. ३ ( प्रतिनिधी ) इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दूसऱ्या दिवशी भारताने कालच्या ३३६/६ वरुन आपला डाव सुरु केला . त्यात आज सकाळी ६० धावांची भर घालून भारताचा पहीला डाव सर्वबाद ३९६ धावांवर आटोपला .आजच्या खेळाचे वैशिष्ट्य म्हणजे यशस्वी जैस्वालचे द्विशक भारताच्या या धड़ाकेबाज युवा फलंदाजाने कालच्या नाबाद १७९ वरुन आज…

Read More

कृषी क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी AI चा वापर

दिल्ली दि. ३ ( प्रतिनिधी )भारतातील कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील विविध आव्हाने सोडवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI ,आर्टिफिशियल इंटेलिजेंस ) पद्धती वापरल्या आहेत. त्यात प्रामुख्याने ‘किसान ई-मित्र’ हा एआय-संचालित चॅटबॉट आहे जो शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या प्रश्नांसाठी मदत करतो. एकापेक्षा अनेक भाषांना हा चॅटबॉट समर्थपणे मदत करतो . AI…

Read More
error: Content is protected !!