‘हिरिताचं देनं घेनं’ काव्यसंध्येत निसर्गकन्याच्या कवितेंचा वर्षाव
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘निसर्गकन्या’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बहिणाबाईंच्या ओव्या आजही जनमानसात जीवंत आहेत. त्यांच्या काव्य साहित्यातून श्रमजीवी जीवन, निसर्गाचे सौंदर्य, स्त्रियांचे भावविश्व आणि ग्रामीण संस्कृती यांचे प्रतिबिंब ‘हिरिताचं देनं घेनं’ या श्रावण काव्यसंध्येत उमटले. बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या १४५ व्या जयंतीनिमित्त…
