साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार द्या लहुजी क्रांती मोर्चा व भारत मुक्ती मोर्चाची राज्यपालांकडे मागणी.
जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : लोकनायक, लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपला देह शोषित, श्रमिक, कामगार आणि वंचितांसाठी आयुष्यभर झिजवला. त्यांचे साहित्य २७ भाषांमध्ये प्रकाशित झालेले आहे. अशा महामानवाला भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा. या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी निवासी उप जिल्हाधिकारी जळगाव यांना अनिल नामदेव साठे लहुजी क्रांती मोर्चा व ॲड.आनंद कोचुरे यांच्या…
