सामाजिक क्रांतिचे शिल्पकार…
महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यासंगी विद्वान होते. त्यांचे विचार चिरंतन राहिले आहेत. शाश्वत विचारांची शिदोरी देणा-या या युगपुरुषासमोर जगातील सर्व लोक आदराने नतमस्तक होतात. सामाजिक विषमतेविरुद्ध यशस्वी लढा देऊन हजारो वर्षापासून अंधारात गडप झालेल्या मूक समाजाला जागृत करण्याचे अलौकिक कार्य डॉ. आंबेडकरांनी केले. कुत्र्या- मांजरापेक्षाही हीन जीवन जगणाऱ्या अखिल वंचित समाजाला “शिका, संघटित व्हा…
