खबरदार : बेकायदा वृक्षतोड केल्यास भरावा लागणार ५० हजारांचा दंड !
मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पर्यावरण संवर्धन काळाची गरज असुन, सर्रास होत असलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरण समतोल बिघडत चालला आहे. बेकायदा होत असलेल्या वृक्षतोडीवर आळा घालण्यासाठी बेकायदा वृक्षतोडीच्या दंडाची रक्कम एक हजार रुपयांवरून ५० हजार करण्यात येणार आहे. यासाठी पुढील आठवड्यात आदेश जारी करण्यात येणार असल्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत केली….
