Home » राष्ट्रीय

ममता बॅनर्जी यांचा खळबळजनक दावा : अपघात नसून त्यामागे काही कट असण्याची शक्यता !

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्रचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज दि. २८ रोजी सकाळी बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातून मोठी शोककळा पसरली आहे. मात्र, ही घटना केवळ अपघात नसून त्यामागे काही कट असण्याची शक्यता वर्तवली असून राजकीय नेत्यांनी…

Read More

सीनिअर सिटिझन कार्ड २०२५ : केंद्र सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी १ डिसेंबरपासून लागू

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : ‘सीनिअर सिटिझन कार्ड २०२५’ या नवीन उपक्रमाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. देशातील ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य, आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने आज हा मोठा निर्णय घेतला. या कार्डद्वारे ६० वर्षांवरील नागरिकांना आठ प्रकारच्या महत्त्वपूर्ण सुविधा ह्या एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. सदर कार्डसाठी ऑनलाईन…

Read More

भीषण स्फोटाने राजधानी हादरली ! ९ ठार …२८ जखमी

दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : राजधानी दिल्लीत आज दि १० सोमवार रोजी संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ हाय सिक्युरिटी झोन असलेल्या भागात एका कारमध्ये स्फोट झाला आहे. या स्फोटात जवळपासच्या ६ कार, २ रिक्षा, काही मोटरसाइकली देखील पेटल्याची माहिती मिळत आहे. या स्फोटानंतर अग्निशमन दल आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेत ९ व्यक्तींचा…

Read More

महिला विश्वचषक २०२५ : ऑस्ट्रेलियावर विश्वविक्रमी विजय मिळवत भारत अंतिम फेरीत !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : भारताच्या जेमिमा रॉड्रिग्ज हिच्या शानदार शतकी खेळीमुळे भारतीय महिला क्रिकेट संघाने गुरुवारी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये ऑस्ट्रेलियाचा पाच विकेटने पराभव करत आयसीसी महिला विश्वचषक २०२५ च्या अंतिम फेरीमध्ये दिमाखदार प्रवेश केला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ४९.५ षटकांत सर्वबाद ३३८ धावा करत भारतासमोर विजयासाठी विश्वचषक बाद फेरीतील आतापर्यंतचे…

Read More

जैन इरिगेशनला निर्यातीबद्दल राष्ट्रीय पुरस्कार ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सोहळ्यास उपस्थिती

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : नवनवीन तंत्रज्ञान कृषीक्षेत्रात विकसीत करून संशोधनाच्या क्षेत्रात दैदीप्यमान काम केलेल्या व शेतक-यांच्या जीवनात मोठे आर्थिक परिवर्तन घडवून आणणाऱ्या जैन इरिगेशनचा शिरोपेचात आणखी एक पुरस्कार वाढला आहे. जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडला निर्यातीत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ५६ व्या ईईपीसी इंडिया नॅशनल एक्सपोर्ट अवॉर्ड्स गौरविले गेले आहे. इंडस्ट्रीयल मशनरी अँड इक्यूपमेंट…

Read More

हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक

हरियाणा ( वास्तव पोस्ट ) : हरियाणामधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे पोलिसांनी हेरगिरीच्या गंभीर आरोपाखाली हिसार येथून प्रसिद्ध युट्यूबर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्राला अटक केली आहे. ज्योतीवर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी काम करण्याचा आणि भारताच्या लष्करी ऑपरेशन ‘ऑपरेशन सिंदूर‘सह लष्कराची गोपनीय माहिती शत्रू देश पाकिस्तानला पाठवण्याचा आरोप आहे. ज्योतीविरुद्ध भारतीय दंड…

Read More

सिमावर्ती भागांमधील हल्ल्यांचा आयपीएल स्पर्धेवर परिणाम ; उर्वरित सर्व सामने स्थगित करण्याचा निर्णय !

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमापार झालेल्या संघर्षादरम्यान जवळच्या शहरांमध्ये छापा टाकण्याचे सायरन वाजल्याने काल पंजाब किंग्ज (पीबीकेएस) आणि दिल्ली कॅपिटल्स (डीसी) यांच्यातील हंगामातील ५८ वा सामना रद्द करण्यात आल्यानंतर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ चे भविष्य आता अनिश्चिततेच्या गर्तेत सापडले आहे. दरम्यान बुधवारी पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांमध्ये ड्रोन…

Read More

● ब्लॅक आउट : आईपीएल मधील पंजाब विरुद्ध दिल्ली सामना थांबवला ; प्रेक्षक आणि खेळाडू मैदानाबाहेर

धर्मशाला ( वास्तव पोस्ट ) : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या लष्करी कारवाईदरम्यान, धर्मशाला येथे खेळला जाणारा पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना सुरक्षिततेच्या कारणामुळे मधेच थांबविला आणि काही वेळाने तो रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मैदानावरील फ्लडलाईट्स पहिल्यांदा ९:२९ मिनिटांनी बंद करण्यात आले. यानंतर, खेळाडू आणि प्रेक्षक मैदानाबाहेर जायला निघाले. तथापि, सामना…

Read More

पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला ; लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय आणि प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त !

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : भारताने पाकिस्तानला धडा शिकवला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कळते की ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये लष्कर-ए-तैयबाच्या सर्वात महत्त्वाच्या प्रशिक्षण शिबिराचाही समावेश आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबद्दल भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानमधील ९…

Read More

सिनेमा सृष्टीतील जेष्ठ अभिनेते मनोज कुमार काळाच्या पडद्याआड

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता मनोज कुमार यांचे दि ४, शुक्रवार रोजी सकाळी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. मनोजकुमार हे त्यांच्या देशभक्तिपर चित्रपटांसाठी ओळखले जायचे. त्यांना भरत कुमार म्हणूनही ओळखले जात असे. उपकार, पूरब-पश्चिम, क्रांती, रोटी-कपडा और मकान हे त्यांचे यशस्वी चित्रपट होते. मनोज कुमार यांना…

Read More

लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक बहुमताने मंजूर !

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : भारतीय संसदेच्या लोकसभेत आज एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. बहुचर्चित वक्फ संशोधन विधेयक २०२५ अखेर मंजूर झाले आहे. मध्यरात्री उशिरापर्यंत चाललेल्या चर्चा आणि मतदान प्रक्रियेनंतर हे विधेयक लोकसभेत बहुमताने पारित झाले. सदर विधेयकाच्या बाजूने २८८ मते, तर विरोधात २३२ मते पडली. आता हे विधेयक आज, ३ एप्रिल २०२५…

Read More

खासदारांच्या वेतन, पेंशन आणि भत्त्यांमध्ये मोठी वाढ जाहीर !

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांना आता अधिक आर्थिक लाभ मिळणार असून, माजी खासदारांचे पेन्शनही वाढवण्यात आले आहे. ही वेतनवाढ १ एप्रिल २०२३ पासून लागू असल्याने खासदारांना आणि माजी खासदारांना थकबाकीसह वाढीव रक्कम मिळणार आहे. याबाबतची अधिसूचना २४ मार्च २०२५ रोजी जारी करण्यात आली. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भार…

Read More

भाजप आमदारावर मेटाने केली कारवाई ! फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट केले बंद !

Meta took action : टी राजा सिंह हे तेलंगणामधील भारतीय जनता पक्षाचे एक दिग्गज नेते आहेत. ते अनेकदा त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कंपनी मेटाने त्यांच्या सोशल मिडियाचे अकाउंट बंद करण्याची कारवाई केली आहे. नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : मेटाने भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार टी राजा सिंह यांच्याशी संबंधित…

Read More

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत झालेल्या १८ जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : शनिवार दि.१५ रोजी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत तीन मुलांसह १८ जणांचा मृत्यू झाला. या चेंगराचेंगरी आणि मृत्यूंमागील कारण रेल्वे प्रशासनाचे निष्काळजीपणा असल्याचे आढळून आले आहे. रात्री ८ वाजल्यापासून रेल्वे स्थानकावरील गर्दी वाढतच गेली, परंतु रेल्वेने त्यांना हाताळण्यासाठी वेळेवर कोणतीही पावले उचलली नाहीत. एवढेच नाही तर…

Read More

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक !

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवीन फौजदारी कायद्या संदर्भातील महाराष्ट्रातील अंमलबजावणीचा आढावा घेतला. या तीन कायद्यांच्या अंमलबजावणीतून राज्यात गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तीन नवीन कायद्यांच्या…

Read More
error: Content is protected !!