सामाजिक परिवर्तनाचा वारसा समृद्ध करु या : डॉ. फडणवीस
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मानवी जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी महात्मा गांधींसह अनेक महापुरुषांनी निवडलेला सामाजिक परिवर्तनाचा वारसा पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी आजच्या तरुणांची आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित नॅशनल गांधीयन लीडरशिप कॅम्पमध्ये देशभरातून आलेल्या तरुणांनी हा वारसा समृद्ध करावा अशी अपेक्षा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठाच्या माजी कुलगुरु व खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षण संचालिका…
