गड किल्ल्यातून महाराष्ट्राचे दर्शन घडविणारी प्रदर्शनी ; शौर्यवीर ढोल पथकाने वेधले लक्ष
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘गड किल्ल्यांनी राखले स्वराज्य, गड किल्ल्यांनी स्थापले स्वराज्य, गड किल्ल्यांतून मावळा लढला, गड किल्ल्यातून महाराष्ट्र घडला’ या विषयानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या आणि संवर्धित केलेल्या निवडक ३९ दुर्गांचे विहंगम दर्शन प्रदर्शनातून गणेश भक्तांना पाहता येत आहे. काव्यरत्नावली चौकात भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशउत्सवात मंडळातर्फे…
