गद्दारांचा हिशोब जनताच निवडणुकीत करणार : वैशाली सुर्यवंशी ; शेतकरी मेळाव्यात विकासाची ग्वाही
पाचोरा ( वास्तव पोस्ट ) : ‘निवडणुकीपर्यंत सर्वांना लाडकी बहिण आठवणार आहे. निवडणुकीच्या नंतर मात्र माझ्यासारखी बहिणच आपल्या उपयोगात येणार आहे. तर गद्दारांचा हिशोब ही जनताच निवडणुकीत करणार आहे’, अशा शब्दात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र सोडले. त्या पिंपळगाव हरेश्वर येथील शेतकरी मेळाव्यात बोलत होत्या. शेतकरी शिवसंवाद यांच्या अंतर्गत…
