‘रेमल चक्रीवादळ’ पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकले ; पर्यटकांना बाहेर न पडण्याचा इशारा
कोलकता ( वास्तव पोस्ट न्यूज ) : बांगलादेशाच्या सिमेहुन निघालेले ‘रेमल चक्रीवादळ’ पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकल्यामुळे किनारपट्टी भागात प्रचंड नुकसान झाले आहे.यामध्ये कोलकाता येथील एकाचा मृत्यू झाला. चक्रीवादळासोबत आलेल्या मुसळधार पावसामुळे त्या परिसरातील घरे, शेत पाण्याखाली गेली आहेत. ताशी १३५ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या या वाऱ्यांमुळे किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तीनही किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा…
